विशेष प्रतिनिधी
मुंबई : राजकारण आपल्या ठिकाणी. पण राजकारण करताना धर्माचा दुरुपयोग करून सत्ता मिळवणे हा तेवढाच मोठा अधर्म आहे. आम्ही हिंदू आहोत. हिंदू म्हणून जन्माला आलो हिंदू म्हणूनच मरणारही आहोत, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर हल्लाबोल केला.
अखिल भांडुप वारकरी सांप्रदाय मंडळाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहात ठाकरे बोलत होते. ते म्हणाले, नवीन वर्ष सुरू होऊन 17 , 18 दिवस झाले. पण माझ्या नवीन वर्षाची सुरुवात आज पासून झाली. आजचा हा माझा पहिला कार्यक्रम आहे इथे मी या वर्षात पहिलाच प्रथम माईक हातात धरला आणि तो तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने. पांडुरंगाच्या दर्शनाने या नवीन वर्षाची सुरुवात केली
सत्तेची कास धरणारे अनेक आहेत. पण सत्याची कास धरणारी माणसं फार थोडी राहिली आहेत, अशी खंत व्यक्त करून ठाकरे म्हणाले, जेव्हा जेव्हा हिंदुत्वावर, हिंदू धर्मावर संकट आलं त्यावेळेला शिवसेनाप्रमुख पहाडा पणाने उभे राहिले. संपूर्ण देशात गर्व से कहो हिंदू हे म्हणणारे एकमेव व्यक्ती म्हणून त्यांना हिंदुहृदयसम्राट म्हणतात. त्यांच्या आधी त्यांचे वडील म्हणजे माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांनी धर्मातल्या वाईट अनिष्ट रूढी परंपरा याच्याविरुद्ध लढा दिला.
पालकमंत्र्यांची यादी अखेर जाहीर, धनंजय मुंडे यांना मोठा धक्का, अजित पवार पुण्यासह बीडचे पालकमंत्री
पण आज जे काही चाललं आहे, धर्म कोणत्या दिशेने चालला आहे? कोण नेता आहे, धर्माच्या नाड्या कोणाच्या हातात आहेत हेच कळत नाही. मधल्या काळात नीच प्रकार झाला. उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडले असा आरोप झाला. तुमचा विश्वास बसेल का हिंदुहृदयसम्राट यांचा पुत्र आणि प्रबोधनकार यांचा नातू हा हिंदुत्व सोडेल. मेलो तरी सोडणार नाही.
एकमेकांचा सन्मान करणे, मातेचा मान राखणं आदर राखणं हा सगळा संस्कार आता जातो आहे की काय असे वाटत आहे. मला इथे राजकारण आणायचं नसलं तरी ज्या पद्धतीने राज्य कारभार हाकला जात आहे त्यामुळे म्हणावे लागते. आपल्या आयुष्याशी निगडित गोष्ट आहे, असेही ठाकरे म्हणाले.
Gaining power by misusing religion, Uddhav Thackeray’s attack on BJP
महत्वाच्या बातम्या
- शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा आघाडीवर येणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
- कुणाशी जरी लागेबांधे असले तरी आरोपीला सोडणार नाही, एकनाथ शिंदे यांची ग्वाही
- प्रजासत्ताकदिनी काँग्रेसची ‘जय बापू, जय भीम, जय संविधान’ रॅली
- सर्वोच्च न्यायालयात निर्णय झाला तर तीन-चार महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, मुख्यमंत्र्यांची माहिती