Jayant Patil जानकर यांच्या नौटंकीत जयंत पाटीलही सहभागी! म्हणतात बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याचे मान्य केले तरच राजीनामा द्या…

Jayant Patil जानकर यांच्या नौटंकीत जयंत पाटीलही सहभागी! म्हणतात बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याचे मान्य केले तरच राजीनामा द्या…

Jayant Patil

विशेष प्रतिनिधी

मुंबई: उत्तम जानकर यांच्या नौटंकीत आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जयंत पाटील हे देखील सहभागी झाले आहेत. मी त्यांना सांगितलं होतं निवडणूक आयोगाने जर बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याचं मान्य केले तरच राजीनामा द्या, असे मी त्यांना सांगितले असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांनी २३ जानेवारी रोजी आपण आमदारकीचा राजीनामा दिल्लीत निवडणूक आयोगाकडे देणार असल्याचे म्हटले आहे. मात्र ही त्यांची केवळ चमकोगीरी असल्याची टीका होत आहे. कारण निवडणूक आयोगाकडे राजीनामा दिला तरी स्वीकारण्याची कायदेशीर तरतूद नाही. आमदाराला खरेच राजीनामा द्यायचा असेल तर विधानसभा अध्यक्षांकडे द्यावा लागतो. यावर पत्रकारांनी विचारले असता पाटील म्हणाले, मी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

मी ते बातम्यातूनच ऐकले आहे. पण त्यांनी नक्की असं केलं आहे का ते मला कन्फर्म नाही. मी त्यांना सांगितलं होतं निवडणूक आयोगाने जर बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याचं मान्य केले तरच राजीनामा द्या. तोपर्यंत असे करणे फारसे योग्य होणार नाही, पण त्यांनी अद्याप मला असे कळवलेले नाही. त्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा देऊ नये हे आम्ही त्यांना नक्कीच सांगू.


पालकमंत्र्यांची यादी अखेर जाहीर, धनंजय मुंडे यांना मोठा धक्का, अजित पवार पुण्यासह बीडचे पालकमंत्री


राम सातपुते यांनी जानकर यांच्यावर टीका केली आहे. यावर पाटील म्हणाले, निवडणूक आयोगाने बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी हा जानकर यांचा आग्रह आहे. त्याकडे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी निवडणूक आयोगाकडे राजीनामा देणार असे म्हणत आहेत. मारकडवाडीच्या ग्रामस्थांना असं वाटतं की आपण ज्या उमेदवाराला मतदान केलं त्याला ते मतदान केलं नाही हा व्यवस्थेचा दोष आहे. आधी पेपरवर निवडणुका होत असताना स्वतःच्या हाताने शिक्का मारला जात होता. त्यामुळे त्यावर विश्वास होता. मात्र आता बटन दाबल्यानंतर कोणाला मत जातं यावर लोकांच्या मनात शंका आहेत. त्यामुळेच मरकडवाडीच्या मतदानाचा प्रयोग झाला होता. उत्तम जानकर हे लोकांचे प्रतिनिधी आहे त्यामुळे लोकांच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.

अजित पवार यांनी बीडचे पालकमंत्री घेतले यावर ते म्हणाले, बीडमधील जे प्रश्न आहेत, ते इतके जटील झाले आहेत ते पाहता अजित पवार यांनी तिथे स्वतः जाणे पसंत केले असेल. पालकमंत्री पदाची जबाबदारी वाटण्याचे काम हे सत्तेत बसलेल्या मुख्यमंत्र्यांचे, उपमुख्यमंत्र्यांचे असते. कोणाला कुठले पालकमंत्री पद दिल यावर टीका टिपणी करण्यापेक्षा ज्याला जी जबाबदारी दिलेत ते कशा पद्धतीने पार पाडतात हे पाहुयात.

चंद्रांतदादा पाटील यांच्या पालक मंत्रीपदाबाबत ते म्हणाले, चंद्रकांतदादांना सांगलीचे पालकमंत्री पद मिळालं याचा आम्हा सर्वांना समाधान आहे. सर्वांना बरोबर घेऊन जिल्ह्याच्या विकासामध्ये ते लक्ष घालतील असा आम्हा सर्वांना विश्वास आहे.

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडलेली आहे असा आरोप करत पाटील म्हणाले, बीडपासून ते सिने अभिनेत्याच्या घरात घुसण्यापर्यंत लोक जात असतील तर हे गंभीर आहे. लोकांचे धाडस वाढत आहे. पोलीस आपला परिणाम दाखवण्यास कमी पडतायत. पोलीस एका बाजूने काम करतायेत असं लोकांना वाटू लागले आहे. लोकांचा जर पोलिसांवरचा विश्वास कमी झाला तर फार मोठे प्रश्न होतील. त्यामुळे सरकारने यामध्ये लक्ष घालणे गरजेचे आहे,. कुठलीही बाजू न घेता न्याय देण्याची व्यवस्था झाली पाहिजे

Jayant Patil also participated Uttam Jankar drama

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023