विशेष प्रतिनिधी
बीड : ज्या घटनेशी आपला कोणताही संबंध नव्हता, त्या घटनेवरून सलग 250 दिवस इलेक्ट्रॉनिक मीडियावर माझी ट्रायल चालली, अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते आमदार धनंजय मुंडे यांनी एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली आहे. Dhananjay Munde
मस्साजोगचे सरपंच संतोश देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मीक कराड याचे नाव आल्यानंतर धनंजय मुंडे यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यायला लागला होता. यावर बोलताना ते म्हणाले “अत्यंत कठीण काळात मी दोनदा मरता मरता वाचलो होतो. आज मी तुमच्या आशीर्वादामुळेच तुमच्यासमोर उभा आहे.
ते म्हणाले, माझा जन्म लोकांची सेवा करण्यासाठी झाला आहे. त्या कठीण काळात मी कुठल्याही माध्यमांवर बोललो नाही. मी प्रामाणिकपणे सांगतो, मी सगळ्या आजारांतून बाहेर पडलो आहे, फक्त आता डोळ्यांच्या आरोग्याचे थोडे बाकी आहे. पण माझा जन्म लोकांची सेवा करण्यासाठी झाला आहे, म्हणूनच मी आज तुमच्यासमोर आहे. मला फक्त तुमची सेवा करायची आहे, दुसरे काही नाही. Dhananjay Munde
विधानसभा निवडणुकीत झालेल्या विजयावर भाष्य केले. या निवडणुकीत मायबाप जनतेने मला 1 लाख 42 हजार मतांच्या प्रचंड आघाडीने निवडून दिले. मतांच्या आघाडीत महाराष्ट्रात आपण पहिल्या क्रमांकावर आहोत. मात्र, एवढा मोठा विजय मिळूनही आपल्याला तो साजरा करता आला नाही, अशी खंतही मुंडेंनी व्यक्त केली. Dhananjay Munde
Trial on electronic media for 250 consecutive days without any connection, Dhananjay Munde regrets
महत्वाच्या बातम्या
- Vijay Vadettiwar : काॅंग्रेसवर टीका करणाऱ्या जरांगे पाटील यांचा बोलवता धनी कोण? विजय वडेट्टीवार यांचा सवाल
- Devendra Fadnavis : शेतकऱ्याला पुन्हा उभे करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माेठ्या पॅकेजची घाेषणा
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पुणेकरांसाठी नव्या संधींचे द्वार , मुरलीधर मोहोळ यांचे प्रतिपादन
- बनावट पासपोर्ट प्रकरणी नीलेश घायवळसह काढून देण्यासाठी मदत करणाऱ्या दोघांविरुद्धही गुन्हा