Devendra Fadnavis : महाराष्ट्रात एकही पाकिस्तानी नागरिक राहणार नाही , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
महाराष्ट्रातील सर्व पाकिस्तानी नागरिकांचा ठावठिकाणा लागलेला असून, एकही नागरिक हरवलेला नाही, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. पुणे महापालिकेच्या वतीने आयोजित ‘अर्बन डायलॉग’ या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. “सर्व पाकिस्तानी नागरिक आढळले असून, आज रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत ते देशाबाहेर जातील,” असे त्यांनी स्पष्ट केले.