Narendra Modi : जागतिक अस्थिरतेत भारत दीपस्तंभासारखा ! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास

Narendra Modi : जागतिक अस्थिरतेत भारत दीपस्तंभासारखा ! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास

Narendra Modi

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Narendra Modi  जागतिक तणाव, अस्थिरता, व्यापारातील अडथळे आणि पुरवठा साखळीतील बदलाच्या पार्श्वभूमीवर भारत हा जगासाठी ‘स्थिर दीपस्तंभ’ ठरू शकतो, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीकेले.Narendra Modi

मुंबईत सुरू असलेल्या ‘इंडिया मेरिटाईम वीक २०२५’ अंतर्गत आयोजित ‘मेरिटाईम लीडर्स कॉन्क्लेव्ह’ मध्ये मोदी बोलत होते. ते म्हणाले, भारत हा धोरणात्मक स्वायतत्तेचे, शांततेचे आणि सर्वसमावेशक विकासाचे प्रतीक आहे. जेव्हा जागतिक परिस्थिती अस्थिर असते. तेव्हा जगाला एका स्थिर दीपस्तंभाची गरज भासते. भारत ती भूमिका समर्थपणे पार पाडू शकतो. भारताची लोकशाही आणि विश्वासार्हता हीच आपली खरी ताकद आहे.Narendra Modi

मोदी म्हणाले की, देशातील सागरी सागरी क्षेत्रात भारत झपाट्याने प्रगती करत आहे. भारताच्या प्रमुख बंदरांची क्षमता दुप्पट झाली असून जहाजांच्या ‘टर्न अराउंड टाइम ‘मध्ये मोठी घट झाली आहे. पर्यटनाला गती मिळाली असून अंतर्देशीय जलमार्गावरील मालवाहतूक ७०० टक्क्यांनी वाढली आहे. आपल्या कार्यरत जलमार्गांची संख्या फक्त तीनवरून वाढून ३२ इतकी झाली आहे. गेल्या दशकात आपल्या बंदरांचा वार्षिक निव्वळ नफा नऊपट वाढला आहे.

भारताचा सागरी क्षेत्रातील विकास वेगाने आणि ऊर्जेने पुढे सरकत आहे. आज आपल्या बंदरांची गणना विकसनशील जगातील सर्वात कार्यक्षम बंदरांमध्ये होते. अनेक बाबतींत ती विकसित देशांपेक्षा अधिक चांगली कामगिरी करत आहेत, असे मोदी म्हणाले.
शंभर वर्षांहून जून वसाहतीकालीन नौकानयन कायदे आम्ही रद्द करून २१ व्या शतकासाठी अनुरूप आधुनिक कायदे लागू केले आहेत. या नव्या कायद्यांमुळे राज्य समुद्री मंडळांची भूमिका अधिक सक्षम झाली असून बंदर व्यवस्थापनात डिजिटल तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला आहे. ‘मेरिटाईम इंडिया व्हिजन’ अंतर्गत आतापर्यंत १५० हून अधिक उपक्रम सुरू करण्यात आले असून त्यामुळ े सागरी क्षेत्रात लक्षणीय सुधारणा झाल्याचे त्यांनी सांगितले.

पंतप्रधानांनी सांगितले की, भारताच्या वाढीसाठी सागरी क्षेत्र हे एक महत्त्वाचे इंजिन ठरत आहे. मागील दशकात या क्षेत्रात आमूलाग्र बदल झाले असून व्यापार व पायाभूत सुविधांमध्ये मोठी प्रगती झाली आहे. २१ व्या शतकाचा एक चतुर्थांश कालावधी संपला आहे. पुढील २५ वर्षे अधिक निर्णायक असणार आहेत. त्यामुळे आमचा भर ब्ल्यू इकॉनॉमी आणि शाश्वत किनारी विकासावर आहे. ग्रीन लॉजिस्टिक्स, पोर्ट कनेक्टिव्हिटी आणि किनारी औद्योगिक क्लस्टर्स यांवर आम्ही विशेष लक्ष केंद्रित करत आहोत. सागरी क्षेत्रातील पुढील पिढीच्या सुधारणा गतीमानरित्या राबवल्या जात आहेत, असे ते म्हणाले.

India is like a beacon in a time of global instability! Prime Minister Narendra Modi believes

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023