ईव्हीएममध्ये कोणत्याही प्रकारे छेडछाड अशक्यच, निवडणूक आयोगाचा दावा

विशेष

मुंबई : निवडणूक आयोगाने पुन्हा एकदा स्पष्ट केले की, ईव्हीएममध्ये कोणत्याही प्रकारे छेडछाड करता येत नाही. त्यामुळे निकालांबाबत शंका घेण्याचे कारण नाही, असं भारत निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे EVM

महाराष्ट्रात २०२४ च्या विधानसभा निवडणुकीचा निकालामुळे विरोधकांना मोठा धक्का बसला. महाविकास आघाडीचे अनेक दिग्गज उमेदवारासह अनेक आमदार पराभूत झाले होते. मात्र, ईव्हीएम मशीन आणि वाढलेल्या मतदानाच्या आकड्यावर विरोधकांनी आक्षेप घेतला होता. मात्र, भारत निवडणूक आयोगाने (ECI) महाराष्ट्र विधानसभेच्या 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर करण्यात आलेल्या ईव्हीएम तपासणी आणि पडताळणी प्रक्रियेत सर्व यंत्रे योग्य स्थितीत असल्याचं स्पष्ट केलं आहे.

या प्रक्रियेत 8 उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष उपस्थित राहून तपासणी पाहिली. एकूण 48 मतदार युनिट, 31 नियंत्रण यंत्रे आणि 31 व्हीव्हीपॅट यांची तपासणी झाली. दोन उमेदवारांनी उपस्थित राहणे टाळले आहे.


आतंकवाद भगवा न कभी था, ना है और ना…मालेगाव बाँबस्फोट निकालावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया


काही मतदारसंघांमध्ये (कोपरी-पाचपाखाडी, ठाणे, खडकवासला, माजलगाव) मायक्रोकंट्रोलर आणि मेमरी पडताळणीसाठी निदान चाचणी घेण्यात आली. तर पनवेल, अलिबाग, आर्णी, येवला, चंदगड, कोल्हापूर उत्तर आणि उर्वरित माजलगाव येथील यंत्रांवर निदान चाचणीबरोबरच मॉक पोल घेण्यात आला. सर्व चाचण्यांमध्ये यंत्रे योग्य कार्यरत असल्याचे प्रमाणित झाले आहेत.

EVMs cannot be tampered with in any way, claims Election Commission

महत्वाच्या बातम्या