विशेष प्रतिनिधी
अहमदाबाद : Air India अहमदाबादहून लंडनकडे जाणाऱ्या एअर इंडियाच्या बोईंग ७८७-८ ड्रीमलाइनर (AI-171) विमानाच्या भीषण अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवासी व जमिनीवर मृत्यूमुखी नागरिकांच्या कुटुंबीयांना दिलासा देण्यासाठी एअर इंडियाने प्रत्येकी २५ लाख रुपयांची तात्पुरती अंतरिम मदत जाहीर केली आहे. ही मदत टाटा सन्सकडून आधीच जाहीर करण्यात आलेल्या एक कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईव्यतिरिक्त असेल. अपघातातून वाचलेल्या एकमेव प्रवाशालाही हीच मदत दिली जाणार आहे.Air India
एअर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) कॅम्पबेल विल्सन यांनी सांगितले की, “आमची पथके घटनास्थळी आहेत. गरजेनुसार तिथेच राहतील. ही अंतरिम रक्कम पीडित कुटुंबांना तात्काळ आर्थिक मदत म्हणून दिली जात आहे.”
या दुर्घटनेत २७० जणांचा मृत्यू झाला होता, ज्यामध्ये विमानातील प्रवासी आणि क्रू सदस्यांसह जमिनीवर असलेले २९ जणांचा समावेश आहे. हे विमान अहमदाबादच्या बी.जे. मेडिकल कॉलेजच्या वसतिगृह व कँटीन भागावर कोसळले होते. यामध्ये विद्यार्थ्यांचाही मृत्यू झाला.
एअर इंडिया सध्या पीडित कुटुंबांना त्यांच्या प्रियजनांच्या शवांची ओळख पटवून देण्यात प्रशासनाला मदत करत आहे. यासोबतच, भारताच्या नागरी उड्डाण महासंचालनालयाच्या (DGCA) निर्देशानुसार ड्रीमलाइनरची विशेष तपासणीही सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान, केंद्रीय गृहसचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीने अपघाताच्या चौकशीसाठी काम सुरू केले आहे. विमानाचे ‘ब्लॅक बॉक्स’ (फ्लाइट डाटा रेकॉर्डर व कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर) तपासले जात असून, फॉरेन्सिक तज्ज्ञांकडून अवशेषांची बारकाईने पाहणी सुरू आहे.
या भीषण दुर्घटनेने केवळ प्रवासीच नव्हे तर वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबांनाही हानी पोहोचवली आहे. संपूर्ण देशभरातून हळहळ व्यक्त केली जात असून, सरकारी यंत्रणा व एअर इंडिया यांनी तातडीने मदतीचा हात पुढे केला आहे.
Air India gives additional Rs 25 lakh to families of Ahmedabad plane crash victims
महत्वाच्या बातम्या
- Girish Mahajan : तुम्ही राजकीय दलाली केल्यामुळेच उद्धवजींची सेना संपली, गिरीश महाजन यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार
- Rupali Chakankar : रुपाली चाकणकर काय रश्मिका मंदाना आहेत? सुषमा अंधारे यांचा सवाल
- Aditi Tatkare : सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण लाभ चार महिन्यांपूर्वीच बंद, आदिती तटकरे यांची माहिती
- Raju Shetti : शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना करणाऱ्या माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळात ठेवू नका, राजू शेट्टी यांची मागणी