विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांविरोधात राबविलेले भारतीय लष्कराचे ऑपरेशन सिंदूर यशस्वी ठरले पाकिस्तानचे कंबरडे यामुळे माेडले आहे. या ऑपरेशनची माहिती देशभरात पोहोचवण्यासाठी भाजपकडून तिंरगा यात्रा (Tiranga Yatra) काढली जाणार आहे.
१३ मे ते २३ मे या काळात देशाच्या वेगवेगळ्या भागात तिरंगा यात्रेचे आयोजन केले जाणार आहे. १० दिवस ही यात्रा चालणार आहे. तिरंगा यात्रेच्या माध्यमातून भाजप जनतेपर्यंत ऑपरेशन सिंदूरबद्दलची माहिती पोहोचवणार आहे. भारताने देशाचा स्वाभिमान कशापद्धतीने बळकट केला, असा संदेश दिला जाणार आहे. तिरंगा यात्रा आयोजनाची जबाबदारी पक्षातील वरिष्ठ नेतते संबित पात्रा, विनोद तावडे, तरुण चुग या नेत्यांवर सोपवण्यात आली आहे.
देशाच्या वेगवेगळ्या भागात काढल्या जाणाऱ्या या तिरंगा यात्रांचे नेतृत्व भाजपचे वरिष्ठ नेते करणार आहेत. ऑपरेशन सिंदूरचे यश हे राजकीय इच्छा शक्तीचे यश असल्याचे भाजपने म्हटले आहे. ऑपरेशन सिंदूरची जी उद्दिष्टे होती, ती शंभर टक्के पूर्ण झाल्याचेही भाजप नेत्यांकडून सांगितले जात आहे. वाचा >> तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही,
भाजपचे नेते आणि राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की, भारताने दहशतवाद्यांविरोधात लढाई लढली आणि लष्कराच्या साहसाने हे ऑपरेशन यशस्वी ठरले आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये राफेल विमानांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे आपले वैमानिकही सुरक्षित परत आले आहेत.
BJP to take out Tiranga Yatra across the country to celebrate the success of Operation Sindoor
महत्वाच्या बातम्या
- Harshvardhan Sapkal : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; हर्षवर्धन सपकाळ यांची भूमिका
- Sophia Qureshi : बेजबाबदार पाकिस्तान, भारतावर हल्ला करत असतानाही सुरू ठेवली नागरी विमानसेवा, कर्नल सोफिया कुरेशी यांची माहिती
- Rashtriya Swayamsevak Sangh : देशविरोधी षड्यंत्रांना यश मिळू देऊ नका! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देशवासीयांना आवाहन
- IPL 2025 Postponed : भारत-पाकिस्तान तणावाचा आयपीएलला फटका, स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित