विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशातील भ्रष्टाचार संपवण्यासाठी मोठे मूल्य असलेल्या नोटा बंद व्हायला हव्यात. ५०० रुपयांची नोट बंद करायला पाहिजे, असे मत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू म्हणाले. Chandrababu Naidu
आजतक या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना नायडू म्हणाले, “सर्व जास्त मूल्य असलेल्या नोटा बंद करायला हव्या. तेव्हाच भ्रष्टाचार संपवता येईल. १०० आणि २०० रुपयांपेक्षा कमी मूल असलेल्या नोटाच चलनामध्ये असल्या पाहिजे. ५०० रुपयाच्या नोटेची गरज नाही.
- Devendra Fadnavis : आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी संयमी जीवनशैली आवश्यक, देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन
देशात गरीब-श्रीमंतामधील दरी वाढतेय सरकारच्या मोफत लाभाच्या योजनाबद्दल नायडू म्हणाले, “फ्रीबीज हा योग्य शब्द नाहीये. पूर्वी जास्त कल्याणकारी योजना नव्हत्या. पण, एनटीआर (माजी मुख्यमंत्री एन.टी. रामाराव) यांनी अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या. आज देशात संपत्ती तयार होत आहे. पण, गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दरी वाढत चालली आहे. कल्याणकारी योजना सार्थकी लागल्या पाहिजे आणि त्याचा लाभ प्रभावी पद्धतीने दिला गेला पाहिजे.
“प्रत्येक नागरिकाची जातिनिहाय जनगणना तर केलीच पाहिजे. त्याचसोबत कौशल्य आधारित आणि आर्थिक स्थितीबद्दलही जनगणना केली पाहिजे. आजच्या काळात माहिती खूप शक्तीशाली बनली आहे. त्यातून सार्वजनिक धोरणे अधिक चांगल्या प्रकारे लागू केली केली जाऊ शकतात, असेही नायडू म्हणाले.
Corruption should be ended, 500 rupee note should be banned, says Chandrababu Naidu
महत्वाच्या बातम्या
- Girish Mahajan : तुम्ही राजकीय दलाली केल्यामुळेच उद्धवजींची सेना संपली, गिरीश महाजन यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार
- Rupali Chakankar : रुपाली चाकणकर काय रश्मिका मंदाना आहेत? सुषमा अंधारे यांचा सवाल
- Aditi Tatkare : सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण लाभ चार महिन्यांपूर्वीच बंद, आदिती तटकरे यांची माहिती
- Raju Shetti : शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना करणाऱ्या माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळात ठेवू नका, राजू शेट्टी यांची मागणी