विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: Rahul Gandhi प्रयागराज येथे २०२५ च्या महाकुंभ मेळ्यात मौनी अमावस्येच्या दिवशी झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्यांच्या आकडेवारीवरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेश सरकारवर टीका केली आहे. चेंगराचेंगरीत किमान ८२ लोकांचा मृत्यू झाला असून, सरकारने केवळ ३७ मृत्यूंचीच अधिकृत नोंद केली आहे, असा दावा एका बीबीसी या वृत्तवाहिनीने केला आहे.Rahul Gandhi
या रिपोर्टवर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले, हा अहवाल दाखवतो की कुंभमधील मृत्यूंची आकडेवारी लपवली गेली, जशी कोविड काळात गरीबांच्या मृतदेह आकडेवारीतून गायब करण्यात आले. प्रत्येक मोठ्या रेल्वे अपघातानंतरही सत्य लपवलं जातं, हेच तर भाजप मॉडेल आहे. गरिबांची मोजदाद नाही, म्हणजे जबाबदारीही नाही!”
या वृत्तवाहिनीने आपल्या तपासात ११ राज्यांतील ५० हून अधिक जिल्ह्यांमध्ये जाऊन १०० हून अधिक कुटुंबांची भेट घेतली. या प्रवासात असं समोर आलं की मौनी अमावस्येच्या रात्री, २८-२९ जानेवारी दरम्यान, अमृतस्नानासाठी जमलेल्या हजारोंच्या गर्दीतून झालेल्या चेंगराचेंगरीत किमान ८२ लोकांचा बळी गेला आहे.
सरकारच्या वतीने मात्र केवळ ३७ मृत्यूंचीच नोंद करण्यात आली आहे. या घटनेत ६० पेक्षा अधिक लोक जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. स्थानिक प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, अति गर्दीमुळे रात्री १:३० ते २:०० दरम्यान बॅरिकेड तुटले आणि त्यातून ही दुर्घटना घडल्याचं सांगितलं जातं आहे.
Death in stampede at Prayagraj Mahakumbh Mela, Rahul Gandhi criticizes Uttar Pradesh government over BBC news
महत्वाच्या बातम्या
- अजित पवार आणि संजय शिरसाट यांच्यात समेट; निधी वाटपावरून निर्माण झालेला वाद मिटला
- Sanjay Raut : आंदोलने केली नाहीत तर सत्ताधारी माजतील, संजय राऊत यांचा अजित पवारांवर निशाणा
- Ajit Pawar : जाणीवपूर्वक बदनामी, माझ्या खिशातले पैसे देताे का? अजित पवारांच समाजकल्याण मंत्री संजय शिरसा
- Narayan Rane : मुख्यमंत्री कोणाचा बाप नसतो, नारायण राणे यांची चिरंजीव नितेश राणे यांना समज