Rahul Gandhi’ : राहुल गांधींच्या आरोपांना निवडणूक आयोगाचा खरमरीत प्रतिवाद; ‘कायद्याच्या राज्याचा अपमान’ म्हणत सुनावले

Rahul Gandhi’ : राहुल गांधींच्या आरोपांना निवडणूक आयोगाचा खरमरीत प्रतिवाद; ‘कायद्याच्या राज्याचा अपमान’ म्हणत सुनावले

Rahul Gandhi'

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : Rahul Gandhi’  लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसंदर्भात ‘मॅच फिक्सिंग’चा आरोप करत मतदार यादीतील आकडेवारीवर संशय व्यक्त केला. यावर निवडणूक आयोगाने तीव्र नाराजी व्यक्त करत हा कायद्याच्या राज्याचा अपमान असल्याचे ठणकावून सांगितले आहे. आयोगाने स्पष्ट केले की, त्यांच्या सर्व यंत्रणा आणि आकडेवारी पारदर्शक असून, अपप्रचाराच्या माध्यमातून निवडणूक व्यवस्थेची बदनामी खपवून घेतली जाणार नाही.Rahul Gandhi’

राहुल गांधी यांनी अलीकडेच प्रमुख दैनिकांमध्ये लेख लिहत, महाराष्ट्रातील मतदार यादीत अवघ्या पाच महिन्यांत ४१ लाखांची वाढ ‘संशयास्पद’ असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यांनी आकडेवारी देत करत सांगितले की, २०१९ मध्ये महाराष्ट्रात ८.९८ कोटी मतदार होते, मे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ही संख्या ९.२९ कोटी झाली आणि केवळ पाच महिन्यांत म्हणजेच नोव्हेंबर २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत ही संख्या ९.७० कोटींवर गेली. ही वाढ अवास्तव असून, राज्याची प्रौढ लोकसंख्याच जर ९.५४ कोटी असेल, तर मतदार संख्या त्याहून कशी अधिक असू शकते, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता.

या आरोपांवर निवडणूक आयोगाने २४ डिसेंबर २०२४ रोजी काँग्रेसला लेखी उत्तर पाठवले असून, ते आयोगाच्या संकेतस्थळावरही उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले आहे. आयोगाने म्हटले आहे की, मतदार नोंदणी ही एक सातत्याने चालणारी प्रक्रिया असून, त्यात नवमतदार, स्थलांतरित नागरिक, मृत व्यक्तींची वगळणी यांसारखे बदल नियमितपणे केले जातात. त्यामुळे मतदार यादीतील वाढ ही नैसर्गिक आणि विधीमान्य आहे.

याशिवाय आयोगाने राहुल गांधींवर टीका करत म्हटले आहे की, पराभवाचे खापर निवडणूक यंत्रणेवर फोडणे ही लोकशाहीसाठी घातक प्रवृत्ती आहे. निवडणुकीत सहभागी होणाऱ्या लाखो कर्मचारी, विविध राजकीय पक्षांचे नियुक्त प्रतिनिधी आणि मतदार यांच्याविषयी अशा विधानांनी अविश्वास पसरवण्याचा प्रकार अत्यंत दुर्भाग्यपूर्ण आहे. चुकीची माहिती पसरवणे ही कायद्याच्या राज्यावरील हल्ला असून, त्यातून निवडणुकीची पारदर्शकता आणि प्रामाणिकपणावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा इशाराही आयोगाने दिला आहे.

निवडणूक आयोगाने राहुल गांधींच्या आरोपांना ठोस आकडेवारीसह फेटाळून लावत, निवडणूक यंत्रणेच्या विश्वासार्हतेवर उठणारे सर्व प्रश्न बंद करावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Election Commission’s sharp response to Rahul Gandhi’s allegations; Called it ‘insult to the rule of law’

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023