विशेष प्रतिनिधी
हैदराबाद : एआयएमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानच्या दुटप्पी भूमिकेवर घणाघात केला आहे.झकी-उर-रहमान लखवी या लष्कर-ए-तोयबाच्या कुख्यात अतिरेक्याचे उदाहरण देत पाकिस्तानवर गंभीर आरोप केले. पाकिस्तान दहशतवाद्यांना आश्रय आणि विशेष वागणूक कशी देतो याचा पर्दाफाश त्यांनी केला.
ओवैसी म्हणाले, “जगात कोणताही देश असा नाही जो दहशतवाद्याला न्यायालयीन खटल्याच्या काळातही विशेष वागणूक देतो. पण पाकिस्तानात झकी-उर-रहमान लखवी नावाचा एक अतिरेकी तुरुंगात असताना वडील बनतो. तुरुंगात असूनही त्याला मूल होते आणि त्याचवेळी न्यायालयीन खटल्यालाही गती मिळते. कारण त्याच दरम्यान पाकिस्तानला एफएटीएफच्या ग्रे लिस्टमध्ये टाकण्यात आले होते.”
ते म्हणाले, एफएटीएफ (फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स) ने पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये टाकले तेव्हाच त्या देशाने थोडी जाग आली आणि त्यांनी लखवीसारख्या अतिरेक्यांविरोधातील खटल्यांना थोडी गती दिली. पण त्याआधी अनेक वर्षे हे प्रकरण प्रलंबित होते.”
झकी-उर-रहमान लखवी हा २६/११ मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड असल्याचे भारताने पुराव्यांसह स्पष्ट केले आहे. त्याच्याविरोधात पुरावे असूनही पाकिस्तानने त्याला वर्षानुवर्षे तुरुंगात ठेवले, पण खटल्यात फारशी प्रगती झाली नव्हती.
दहशतवादाचा प्रश्न केवळ भारताचा नाही तर संपूर्ण मानवतेचा आहे. झकी लखवीसारख्या लोकांना तुरुंगात असूनही सवलती देणारा देश स्वतःला कधीही जगाच्या विश्वासास पात्र ठरवू शकणार नाही. ज्या देशांनी दहशतवाद्यांच्या विरोधात ठोस कारवाई केली नाही त्यांना आर्थिक आणि राजनैतिक पातळीवर एकटा पाडले पाहिजे, असे आवाहन ओवैसी यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला केले आहे.
भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर जगभरात भारताची भूमिका मांडण्यासाठी खासदारांचे शिष्टमंडळ विविध देशांमध्ये गेले आहे. या शिष्टमंडळात एआयएमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांचा समावेश आहे. खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी रियाधमध्ये बोलताना सांगितले की, पाकिस्तान अरब वर्ल्ड आणि मुस्लीम देशांना संदेश देतो की, तो एक मुस्लीम राष्ट्र आहे. भारत मुस्लीम राष्ट्र नाही. भारतात 24 कोटी मुस्लीम अभिमानाने आणि शांततेत राहत आहे. पाकिस्तान खोटा प्रोपागंडा करत आहे. पाकिस्तानने दहशतवादी कारवाया थांबवल्या तर दक्षिण आशियामध्ये शांतता येईल. प्रगती आणि विकासाची दारे उघडतील. पाकिस्तान सार्कमध्ये अडचणी निर्माण करत आहे.
असदुद्दीन ओवैसीने म्हटले होते कि पाकिस्तानला एफएटीएफच्या (Financial Action Task Force) ग्रे लिस्टमध्ये पुन्हा टाकले पाहिजे. जेव्हा आसिम मुनीर याला पाकिस्तानमध्ये फील्ड मार्शल बनवले तेव्हा मोहम्मद एहसान नावाचा एक दहशतवादी फील्ड मार्शलच्या शेजारी बसला होता. त्यामुळे पाकिस्तान आणि दहशतवादी यांचे संबंध उघडपणे समोर येत आहे. पाकिस्तान दहशतवाद्यांना प्रशिक्षण देऊन भारतात पाठवतो. भारतात अशांतता निर्माण केली जाते. भारतात हिंदू-मुस्लीम दंगली करण्याचा प्रयत्न केला जातो.
Father became a terrorist while in jail, Asaduddin Owaisi slams Pakistan’s double standards
महत्वाच्या बातम्या
- Kumar Vishwas पाकिस्तानला महिलांची ताकद दाखवून दिली, राष्ट्रीय महिला आयोगाच्या सोहळ्यात कुमार विश्वास यांचे प्रतिपादन
- Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार माळेगावच्या रिंगणात, बिनविरोध निवड होऊ देणार असल्याचा विरोधकांचा इशारा
- Narendra Modi : गोळीला आता गोळ्याने उत्तर मिळेल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इशारा
- Sanjay Raut : जे भाजपाला ‘चंदा’ देतील त्यांचा धंदा जोरात, संजय राऊत यांची टीका