पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: आम आदमी पक्षाचे (आप) प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला झाल्याचा आरोप केला आहे आणि निवडणूक आयोगाकडे नवी दिल्ली मतदारसंघासाठी स्वतंत्र निरीक्षक नियुक्त करण्याची मागणी केली आहे.
आयोगाला लिहिलेल्या पत्रात, केजरीवाल यांनी अशा प्रकरणांमध्ये सहभागी असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) कार्यकर्त्यांना अटक करण्याची आणि संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे. केजरीवाल यांच्या दाव्यांवर भाजप आणि दिल्ली पोलिसांकडून त्वरित कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
भारताच्या आर्थिक इतिहासातील मैलाचा दगड, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले अर्थसंकल्पाचे कौतुक
पत्रात, केजरीवालांनी दिल्ली मतदारसंघात आप कार्यकर्त्यांवरील कथित हल्ल्याच्या घटनांचा उल्लेख केला. शनिवारी रोहिणी परिसरात एका जाहीर सभेदरम्यान आपचे आमदार मोहिंदर गोयल यांच्यावर हल्ला झाल्याचा आरोप आहे. रिठाळा विधानसभा मतदारसंघातील आपचे उमेदवार गोयल सेक्टर ११ मधील ‘पॉकेट एच’ येथील स्थानिक रहिवाशांशी संवाद साधत असताना ही घटना घडली.
‘आप’ने एका पोस्टमध्ये मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना पत्र लिहून नवी दिल्ली विधानसभेत ‘आप’ कार्यकर्त्यांवर वारंवार होणाऱ्या हल्ल्यांची आणि धमकीची माहिती दिली
Kejriwal writes to Election Commission regarding attacks on AAP workers
महत्वाच्या बातम्या
- Nirmala Sitharaman’ : कॅन्सरवरील औषधे, टीव्ही, मोबाईल आणि इलेक्ट्रिक कार होणार स्वस्त
- Modi Govt : मोदी सरकारची मध्यमवर्गीयांना आजपर्यंतची सर्वात मोठी भेट, एक लोक कोटी तोटा सहन करून १२ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त
- Devendra Fadnavis भारताच्या आर्थिक इतिहासातील मैलाचा दगड, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले अर्थसंकल्पाचे कौतुक
- नामदेव शास्त्री टीकेचीही तयारी ठेवा, मनसे नेते प्रकाश महाजन यांचा धनंजय मुंडे भेटीवरून इशारा