Rahul Gandhi : निवडणूक आयोगाचे चर्चेचे निमंत्रण टाळून राहुल गांधींचे हवेत आरोप

Rahul Gandhi : निवडणूक आयोगाचे चर्चेचे निमंत्रण टाळून राहुल गांधींचे हवेत आरोप

Rahul Gandhi

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : Rahul Gandhi निवडणूक आयोगावर सोशल मीडियावर पोस्ट करून आरोप करणारे काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना निवडणूक आयोगाने सात जून रोजीच पत्र पाठवून चर्चेचे निमंत्रण दिले होते. मात्र 15 दिवस उलटूनही राहुल गांधी गेले नसल्याचे समोर आले आहे.Rahul Gandhi

निवडणूक आयोगाने राहुल गांधींना ज्या शंका आहेत त्यावर चर्चा करण्यासाठी भेटायला बोलावले आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत गडबड गोंधळ झाल्याबद्दल राहुल गांधी यांनी एका इंग्रजी वृत्तपत्रात एक लेख लिहिला होता. त्यानंतर लगेचच निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांना 7 जून रोजी हे पत्र पाठवले होते. तसेच आयोगाने हे पत्र मेल करण्यासोबतच 12 जून रोजी राहुल गांधी यांच्या घरी एक व्यक्ती पाठवून त्यांना प्रत्यक्षही दिले होते. मात्र तरीही राहुल गांधी पुन्हा आरोपच करत सुटले आहेत.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राहुल गांधी सातत्याने निवडणूक आयोगावर आरोप करत आहेत. या निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती प्रचंड संख्येने विजयी झाली. तर, काँग्रेसला पराभव स्वीकारावा लागला होता.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबद्दल राहुल गांधींना ज्या शंका आहेत, त्यांचे निरसन करण्याचे आयोगाने ठरवले आहे. यासाठी निवडणूक आयोगाने राहुल गांधींना मेल तसेच पत्र लिहीत थेट चर्चेसाठी आमंत्रण दिले आहे. तसेच त्यांच्या सोयीनुसार लवकरात लवकरची तारीख आणि वेळ निश्चित करून आयोगाच्या कार्यालयात येऊन भेटण्यास सांगितले आहे.

राहुल गांधी यांना चर्चेसाठी बोलावणे करणाऱ्या पत्रात आयोगाने म्हटले आहे की, निवडणुकीसंदर्भात संसदेत जे कायदे पारित झाले आहेत तसेच याबाबत जे नियम आहेत, त्यानुसारच देशातील कोणतीही निवडणूक घेतली जाते. म्हणूनच निवडणुकीत कोणताही गोंधळ झाला आहे, असे म्हणणे चूक आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत गोंधळ झाल्याच्या राहुल गांधींच्या आरोपांना आयोगाने 24 डिसेंबर 2024 एका पत्राद्वारे सविस्तर उत्तर दिल्याचे आयोगाने म्हटले आहे.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत गडबड झाल्याचा आरोप राहुल गांधी करत आहेत. पण, याच निवडणुकीत एक लाखांहून अधिक बूथ लेव्हल एजंट सोबतच राजकीय पक्षांशी संबंधित 1.08 लाख बूथ लेव्हल एजंट देखील होते, असेही आयोगाने म्हटले आहे. यातील राजकीय पक्षांशी संबंधित एजंटपैकी 28 हजारहून अधिक एजंट हे केवळ काँग्रेसचे असल्याचे आयोगाने सांगितले आहे.

यासोबतच हे देखील सांगितले की, काँग्रेस पक्षासोबत होणाऱ्या आयोगाच्या बैठकीचे राहुल गांधी यांना प्रामुख्याने बोलावले जाईल. म्हणजे निवडणुकीसंदर्भात त्यांना असणाऱ्या सगळ्या शंकांचे तातडीने निरसन होईल, असे आयोगाचे म्हणणे आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकत्याच काँग्रेस वगळता भाजपा, बसपा, आप, सीपीआय (एम) आणि एनपीपी या पक्षांसोबत बैठका केल्या होत्या. या बैठकांना भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा, बसपा प्रमुख मायावती, आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल, एनपीपीचे अध्यक्ष कॉनराग संगमा आणि सीपीआयच्या (एम) प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती.

Rahul Gandhi’s allegations in the air, avoiding the Election Commission’s invitation for discussion

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

Warkaris

Warkaris : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेला मुर्तरूप, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षामार्फत आयोजित शिबीराचा १५ हजाराहून अधिक वारकऱ्यांनी घेतला लाभ

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023