विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : S. Jaishankar भारताची दहशतवादाविरुद्ध लढाई केवळ दोन देशांमधील प्रश्न आहे. जागतिक पातळीवरील दहशतवादाविरुद्धचा लढा आहे. आज दुर्लक्ष केले तर पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाची उद्या तुमच्याही मानगुटीवर बसेल असा इशारा परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी पाश्चिमात्य राष्ट्रांना दिला आहे.S. Jaishankar
युरोपियन पोर्टल युराक्टिव्ह ला दिलेल्या मुलाखतीत एस जयशंकर म्हणाले, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष हा केवळ दोन देशांमधील प्रश्न नाही. तर तो जागतिक स्तरावरचा दहशतवादाचा लढा आहे. हा दहशतवादच भविष्यात तुम्हालाच त्रासदायक ठरणार आहे.”
पहलगाम येथे घडलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने दहशतवादी तळांना लक्ष्य करून कठोर कारवाई केली होती. मात्र काही पाश्चिमात्य प्रसारमाध्यमांनी या कारवाईला “टिट-फॉर-टॅट” म्हणजे वैतागून दिलेली प्रतिक्रिया असे म्हटल्याबद्दल नाराजी व्यक्त करताना एस जयशंकर म्हणाले, ही कोणतीही टिट-फॉर-टॅट कारवाई नाही. ही दहशतवादाविरोधातील लढाई आहे. ही लढाई भारतासाठीच नव्हे, तर जगासाठी महत्त्वाची आहे. आज तुम्ही दुर्लक्ष करत आहात, पण उद्या हेच विष तुमच्या घरात पसरलेले दिसेल.
पाकिस्तानच्या भूमिकेवर थेट आरोप करताना एस जयशंकर यांनी सांगितले की, “पाकिस्तान सरकार केवळ दहशतवाद्यांना आधार देत नाही, तर त्यांना आर्थिक मदत, प्रशिक्षण आणि सुरक्षित आसरा देखील पुरवत आहे.मला तुम्हाला आठवण करून द्यायची आहे की ओसामा बिन लादेन नावाचा एक आंतरराष्ट्रीय होता. तो पाकिस्तानच्या सैन्यतळाजवळ वर्षानुवर्षे का राहात होता? पाकिस्तानच्या ‘वेस्ट पॉइंट’च्या समतुल्य सैन्य प्रशिक्षण केंद्राजवळ तो सुरक्षित कसा होता?”
जयशंकर यांनी पाश्चिमात्य देशांना आवाहन केले की, त्यांनी दहशतवादाच्या प्रश्नावर दुटप्पी भूमिका घेणे थांबवावे. पाकिस्तानला मदत करणे आणि त्याच्या वर्तनाकडे दुर्लक्ष करणे, ही लवकरच त्यांच्यासाठी घातक ठरू शकते. आज पाकिस्तान जे करत आहे, त्याचं समर्थन करणं म्हणजे उद्या तुमच्याच नागरिकांना धोका निर्माण करण्यासारखे आहे.
भारत युरोपसाठी एक विश्वासार्ह, स्थिर आणि कुशल कामगार शक्ती असलेला भागीदार आहे. भारताच्या तुलनेत चीनवर विश्वास ठेवणे धोकादायक असल्याचे अप्रत्यक्षपणे सुचवताना ते म्हणाले, भारत तुमच्यासाठी केवळ मोठा बाजार नाही, तर टिकाऊ व स्थिर भागीदार आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. आमच्याकडे कुशल श्रमशक्ती आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्ही विश्वासार्ह आहोत.
गेल्या महिन्यात जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात अनेक निष्पाप नागरिकांचे प्राण गेले. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने “ऑपरेशन सिंदूर” राबवून दहशतवादी तळांवर अचूक आणि आक्रमक कारवाई केली. ही कारवाई संपूर्ण जगाच्या दृष्टीने संदेश देणारी ठरली आहे की, भारत यापुढे दहशतवाद सहन करणार नाही.
The ghost of Pakistan-sponsored terrorism will one day haunt you too, S. Jaishankar warns Western nations
महत्वाच्या बातम्या
- अजित पवार आणि संजय शिरसाट यांच्यात समेट; निधी वाटपावरून निर्माण झालेला वाद मिटला
- Sanjay Raut : आंदोलने केली नाहीत तर सत्ताधारी माजतील, संजय राऊत यांचा अजित पवारांवर निशाणा
- Ajit Pawar : जाणीवपूर्वक बदनामी, माझ्या खिशातले पैसे देताे का? अजित पवारांच समाजकल्याण मंत्री संजय शिरसा
- Narayan Rane : मुख्यमंत्री कोणाचा बाप नसतो, नारायण राणे यांची चिरंजीव नितेश राणे यांना समज