विशेष प्रतिनिधी
शांघाय : दहशतवादाची केंद्रं कुठे आहेत हे भारताने दाखवून दिले आहे. मात्र दहशतवादाची ही केंद्रे आता सुरक्षित नाहीत हे त्यांनी लक्षात ठेवावे. आम्ही त्यांना लक्ष्य करण्यास मागे पुढे पाहणार नाही, हे आम्ही दाखवून दिले आहे, असा इशारा सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी पाकिस्तानला चीनच्या भूमीतून दिला आहे.
चीनमधील किंगदाओ येथे सुरू असलेल्या शांघाई सहकार्य संघटनेच्या बैठकीमध्येही भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरचे पडसाद उमटले असून, भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानचा जवळचा मित्र असलेल्या चीनसमोरच पाकिस्तानचे वाभाडे काढले आहेत. राजनाथ सिंह म्हणाले की, आपल्या प्रदेशामध्ये सर्वात मोठी आव्हानं ही शांतता, संरक्षण आणि परस्पर अविश्वासाशी संबंधित आहेत. तसेच या समस्यांचं कारण वाढता कट्टरतावाद, अतिरेकी आणि दहशतवादी आहेत. शांतता आणि समृद्धी ही दहशतवाद आणि दहशतवादी समुहाच्या हातात विध्वंसक हत्यारं असताना राहू शकत नाही. या आव्हानांचा सामना करण्यासाठी निर्णायक कारवाईची आवश्यकता आहे. तसेच या आव्हानांविरोधात लढण्यासाठी आणि आपल्या सामुहिक सुरक्षेसाठी आपण एकजूट झालं पाहिजे.
राजनाथ सिंह म्हणाले का, जे लोक दहशतवादाला खतपाणी घालत आहेत. तसेच आपल्या संकुचित आणि स्वार्थी हेतूंसाठी दहशतवादाचा वापर करत आहेत, त्यांना याचे परिणाम भोगावे लागतील. काही देश सीमेपलीकडून दहशतवादाला एक धोरण म्हणून वापरत आहेत. तसेच दहशतवाद्यांना आश्रय देत आहेत. अशा दुटप्पी भूमिकेला कुठलंही स्थान असता कामा नये. तसेच एससीओने अशा देशांचा निषेध करण्यासाठी कुठलीही शंका बाळगता कामा नये.यावेळी राजनाथ सिंह यांनी दहशतवादाविरोधातील भारताची भूमिकाही स्पष्ट केली. दहशतवादाविरोधात भारताचं धोरंण त्याच्या भूमिकेतून स्पष्ट होत आहे. यामध्ये दहशतवादाविरोधात स्वत:चं संरक्षण करण्याच्या आमच्या अधिकाराचाही समावेश आहे.
Will not hesitate to target terror centers, Defense Minister rajnath singh warns Pakistan from Chinese soil
महत्वाच्या बातम्या
- Girish Mahajan : तुम्ही राजकीय दलाली केल्यामुळेच उद्धवजींची सेना संपली, गिरीश महाजन यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार
- Rupali Chakankar : रुपाली चाकणकर काय रश्मिका मंदाना आहेत? सुषमा अंधारे यांचा सवाल
- Aditi Tatkare : सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण लाभ चार महिन्यांपूर्वीच बंद, आदिती तटकरे यांची माहिती
- Raju Shetti : शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना करणाऱ्या माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळात ठेवू नका, राजू शेट्टी यांची मागणी