विशेष प्रतिनिधी
पुणे: Ajit Pawar महायुती सरकारमधील घटक पक्षाच्या मंत्र्यांकडून होणाऱ्या वक्तव्यांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. काय बोलायचे ते मंत्रिमंडळाच्या बैठकीत बोला, असे त्यांनी सुनावले आहे.Ajit Pawar
महायुती सरकार मधील शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये सध्या शितयुद्ध सुरु आहे. यावर अजित पवार म्हणाले, जर कोणाची तक्रार करायची असेल तर आम्हा सगळ्यांसमोर करा. म्हणजे आम्हाला पण कळेल. मंत्र्यांना सांगणं आहे की कॅबिनेट बैठक असते इतर ठिकाणी बोलण्यापेक्षा त्या व्यासपीठावर येऊन आपलं मत मांडलं पाहिजेतर समज गैरसमज होणार नाहीत. काही जण नाही चुकून बोलून जातात. चुकीच्या बातमी लागतात. बातम्यांना विषय मिळतो आणि बातम्या सुरू होतात
आम्ही एकोपाने कारभार करत आहोत. त्याच्यामध्ये कुठे भांड्याला भांड लागत असेल तर आपण त्यातून मार्ग काढू . पण कारण नसताना गैरसमज निर्माण करून समाजामध्ये कार्यकर्त्यांच्या मध्ये नागरिकांमध्ये पत्रकारांमध्ये या ही गोष्टीला वाव देऊ नये, असेही पवार म्हणाले.
ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि आमदार अमोल मिटकरी यांच्यात जे काही संभाषण झालं ते मला अजिबात आवडलं नाही. सुसंस्कृत महाराष्ट्राचं राजकारण कसे असले पाहिजे याचा विचार बोलताना केला पाहिजे. प्रत्येकाला तारतम्य असलं पाहिजे. काही जणांमध्ये विकृती असते. त्याला जास्त महत्व द्यायचं कारण नाही. आरोपात काही तथ्य असेल तर आमच सरकार कारवाई करणार, अशी नाराजी पवार यांनी व्यक्त केली.
जिल्हा परिषद बांधकामांच्या विभागांमध्ये काही चुकीच्या गोष्टी होतात हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. त्यामुळे यामध्ये एकच डॅशबोर्ड बनवून वेबसाईट तयार करण्यात आली आहे. अनेकदा बिल थांबायची. ती आता थांबणार नाहीत. सेवानिवृत्तीच्या विभागात देखील असा डॅशबोर्ड तयार केला आहे . त्याच उद्धघाटन केलं. ज्या दिवशी निवृत्त होणार त्याच दिवशी सर्व पैसे मिळणार आहेत. ग्रामपंचायत मधला कर भरण्यासाठी देखील आता क्यू आर कोड बनवला आहे. पुणे मुंबई मध्ये बसून देखील गावाकडच्या घराचा कर आता भरता येणार, आहे असे पवार यांनी सांगितले.
जिल्हा परिषद मधल्या विविध विभागातली माहिती आता व्हाट्सअप चॅटबॉर्ड वर पाहता येणार आहे. अंगणवाडीसाठी देखील एक ॲप तयार केला आहे. त्याचा फायदा देखील लाडक्या बहिणींना होणार आहे. गजानन पाटलांवर जबाबदारी सरकारने दिली. त्यांनी पार पाडली आहे. आपण देखील ती तपासावं वेगळं काही शोधत बसू नका जबाबदारी पार पाडली आहे का ते बघा, असे ते म्हणाले.
लाडकी बहीण योजनेवर विचारलेल्या प्रश्नावर अजित पवार म्हणाले, याबाबदल मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी स्टेटमेंट दिल आहे. ते तुम्ही ऐकलं नाही का मुख्यमंत्री जे बोलतात ते अंतिम असतं. कारण नसताना काहीजण चुकीची चर्चा करत आहेत. आम्हीही प्रचंड बहुमताने निवडून आलेलो आहोत. कुठल्याच घटकांवर अन्याय आम्ही करणार नाही. सगळ्यांना न्याय दिला जाईल. अर्थसंकल्पामध्ये सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाला आपण यंदा 39 ते 41 टक्के वाढ करून अधिक निधी दिला आहे
कोणीही चुकीचा वागला तर त्याच्यावर कारवाई केली जाईल. बीड असुदे इतर ठिकाण असू दे कोणी चुकीच वागलं तरी कारवाई होणारच असे अजित पवारांनी स्पष्ट केले.
शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या संभाव्य प्रीतीच्या चर्चेवर अजित पवार म्हणाले, राज ठाकरे, उद्धव ठाकरे दोघेही एकमेकांच्या पक्षांचे प्रमुख आहेत. इंजिन आणि मशाल यांच्या प्रमुखांनी काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा अधिकार आहे . तुम्ही आणि मी विचार करून काय उपयोग आहे. त्या त्या संदर्भातला निर्णय त्यांचे त्यांच्या पक्षाचे प्रमुख घेतील.
पत्रकार मित्रांनो, तुम्हाला टीआरपी वाढवायचा आहे म्हणून आम्हाला थांबवतात आणखी पुढे दांडकी करता आणि विचारात बसतात, असा टोलाही अजित पवारांनी मारला.
Ajit Pawar is unhappy with the statements made by ministers, he told them to say what they want to say in the cabinet.
महत्वाच्या बातम्या
- Girish Mahajan : तुम्ही राजकीय दलाली केल्यामुळेच उद्धवजींची सेना संपली, गिरीश महाजन यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार
- Rupali Chakankar : रुपाली चाकणकर काय रश्मिका मंदाना आहेत? सुषमा अंधारे यांचा सवाल
- Aditi Tatkare : सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण लाभ चार महिन्यांपूर्वीच बंद, आदिती तटकरे यांची माहिती
- Raju Shetti : शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना करणाऱ्या माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळात ठेवू नका, राजू शेट्टी यांची मागणी