विशेष प्रतिनिधी
अमरावती : बच्चू कडू हा आंदोलक म्हणून जास्त आवडत असल्याने लोकांनी पाडलं असेल, असे मत माजी मंत्री आणि प्रहार जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांनी व्यक्त केले.
पत्रकारांशी बोलताना कडू म्हणाले, बच्चू कडू नेहमी ॲक्शन मोडमध्ये असतो, पराभवाने खचून जात नाही, बच्चू कडू मानसिकतेने किंवा हिंमतीने पडलेले नाहीत.
कर्जमाफी संदर्भात सरकारने स्पष्टता आणावी अशी मागणी करत ते म्हणाले, सगळ्या प्रकरणांमध्ये कर्जमाफी स्पष्ट करण्यात यावी. नेमकं कुठलं कर्ज माफ करणार आहे. 2012 पासून दोन्ही कर्जमाफी मध्ये ज्यांना लाभ मिळाला नाही त्यांना नेमकं काय लाभ मिळणार. जानेवारी ते मार्च हे कर्ज वसुलीचे दिवस आहेत
Devendra Fadnavis : राहुल गांधी परभणीला आले, राजकारण पेरून गेले; मुख्यमंत्र्यांसह भाजपचा हल्लाबोल!!
मात्र सरकारच्या या घोषणेमुळे कर्ज वसुली थांबली आहे. सगळे कर्ज थकीत जाणार. त्यामुळे पुन्हा नवीन कर्ज शेतकऱ्यांना मिळणार नाही त्यासंदर्भात तातडीने स्पष्टता आणावी.नियमित कर्जदारांसाठी काय करणार आहे, त्याबाबत मुख्यमंत्री यांनी तातडीने स्पष्टता द्यावी अन्यथा आम्ही सात तारखेला आंदोलन करू
कर्जमाफी आणि मेंढपाळ लोकांसाठी पर प्रांतीय जनावर येतात, त्याचा परिणाम स्थानिक जनावरांना रोगराई पसरून होतात, मेंढपाळ यांच्यासाठी आंदोलन करू, असे त्यांनी सांगितले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या भेटीबाबत ते म्हणाले, मतदारसंघाचे महत्वाचे विषय होते. त्यासोबतच शकुंतला एक्स्प्रेस, राहिलेले अर्धवट काम, चांदूरबाजार ते परतवाडा रस्ता यावर चर्चा झाली. थोडी राजकारणावरही चर्चा झाली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे असलेल्या विभागा संदर्भातच मी त्यांच्याशी भेट घेतली, शकुंतला ब्रॉड गेज रेल्वे झाली पाहिजे. बंद पडलेल्या मिल संदर्भात मार्ग काढावा, कामगारांना पगार नाही, सरकार भाजपचे आहे त्यावर तोडगा काढावा.
Bacchu Kadu says, that’s why people defeted me!
महत्वाच्या बातम्या
- PM मोदींना कुवेतचा सर्वोच्च सन्मान, ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर प्राप्त करणारे पहिले भारतीय पंतप्रधान
- Ajit Pawar : भुजबळांचे जहाँ नहीं चैना वहा नहीं रहना वर अजित पवार म्हणाले….
- राज – उध्दव ठाकरे नात्यात संजय राऊतांचा बिब्बा, म्हणाले मोदी, शहा, फडणवीस राज यांचे आयडॉल
- वाळू माफियांची दादागिरी मोडून काढणार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा