राहुल गांधींसारखीच अवस्था शरद पवारांची तर झालेली नाही ना? मुख्यमंत्र्यांचा सवाल

राहुल गांधींसारखीच अवस्था शरद पवारांची तर झालेली नाही ना? मुख्यमंत्र्यांचा सवाल

Sharad Pawar

विशेष प्रतिनिधी

गडचिरोली : शरद पवार यांनी विधानसभेच्या निवडणुकीनंतर इतक्या दिवसांनी आणि राहुल गांधी यांना भेटल्यानंतरच याची आठवण का आली? इतके दिवस ते बोलले नाहीत आणि आज अचानक बोलले.

राहुल गांधी जसे रोज सलीम-जावेदच्या स्क्रिप्ट सारख्या काल्पनिक कहाण्या सांगतात, तशीच अवस्था आता शरद पवारांची तर झालेली नाही ना? असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

शरद पवार यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले की, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी दोन अनोळखी व्यक्ती दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी भेटायला आले होते. त्यांनी 160 मतदारसंघांमध्ये निश्चित विजय मिळवून देण्याचा दावा केला होता. यावर मुख्यमंत्री म्हणाले,

आजवर शरद पवारांनी कधीच ईव्हीएमवर शंका घेतली नव्हती, उलट त्यांनी नेहमीच स्पष्ट मत व्यक्त केले की, मतदान यंत्रावर दोष देणं योग्य नाही. मग आता अचानक मतदान प्रक्रियेतील त्रुटींची आठवण का झाली? राहुल गांधींच्या भेटीनंतरच का हे सगळं आठवलं?कितीही संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न झाला तरी आपल्या देशासारखी पारदर्शक निवडणूक कुठेही होत नाही, हे सर्वांना माहिती आहे.

हे जनतेसमोर बोलतात.निवडणूक आयोगाने बोलावले की जात नाही, म्हणतात आम्ही संसदेत शपथ घेतली आहे. कोर्टात आम्ही संसदेत शपथ घेतली आता शपथपत्र देणार नाही असे चालेल का? मग निवडणूक आयोगात तसे कसे चालू शकेल?

राहुल गांधी शपथपत्र देत नाही कारण त्यांना माहिती आहे आपण खोटे बोलत आहोत, आपले खोटं पकडले गेले आणि आपण शपथ पत्रावर दिले तर उद्या फौजदारी कारवाई होऊ शकेल.म्हणून रोज खोटं बोलून पळून जायचे, असे पळपुटे ही लोक आहेत, असा टोला मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधी यांना लगावला आहे.

Hasn’t Sharad Pawar faced the same situation as Rahul Gandhi

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023