विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि केंद्र सरकारने खेळापेक्षा देशाला प्राधान्य कसे द्यावे, याचे धडे अफगाणिस्तानकडून घ्यावेत, असे खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी सुनावले आहे. Priyanka Chaturvedi
पाकिस्तानने युद्धविरामाची सहमती मोडून अफगाणिस्तानच्या पक्तिका प्रांतात हवाई हल्ले केले, असा आरोप तालिबानने केला आहे. यात अफगाणिस्तानचे तीन क्रिकेटपटू ठार झाले आहेत. हल्ल्यानंतर अफगाणिस्तानने पाकिस्तानविरुद्ध होणारी T-20 मालिका रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी देशाला कसे प्राधान्य द्यायचे, हे अफगाणिस्तानकडून शिका, असा टोला केंद्र सरकार आणि बीसीसीआयला लगावला आहे.
प्रियांका चतुर्वेदी यांनी अफगाणिस्तानकडून देशप्रेम शिकण्याचा सल्ला केंद्र सरकार आणि बीसीसीआयला देताना म्हटले आहे की, पाकिस्तानची व्यवस्था काही भ्याड लोकांनी बनलेली आहे. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने पाकिस्तानसोबतचे त्यांचे मालिका सामने रद्द केल्याचे पाहून आनंद झाला. कदाचित बीसीसीआय आणि भारत सरकार खेळांपेक्षा देशाला प्राधान्य कसे द्यायचे याबद्दल टिप्स घेऊ शकतील. पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध आशिया कप स्पर्धेत खेळला.
तेव्हा पाकिस्तानविरुद्ध खेळण्याच्या सरकारच्या निर्णयावर विरोधकांनी बीसीसीआय, केंद्र सरकार आणि आयसीसीवर सडकून टीका केली होती. व्यावसायिक फायद्यासाठी राष्ट्रीय हिताशी तडजोड केल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. या स्पर्धेत भारताने पाकिस्तानला हरवून आशिया कप जिंकला आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला होता. शिवाय पाकिस्तानी संघाशी शेक हँड करण्यासही भारतीय संघाने नकार दिला होता.
मात्र, भारताचे 26 पर्यटक मारल्यानंतरही भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानशी खेळला होता. म्हणूनच बीसीसीआय आणि केंद्र सरकारने पहिले प्राधान्य देशाला द्यायला हवे. खेळापेक्षा देशाला प्राधान्य कसे द्यावे हा धडा अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाकडून घ्यायला हवा, असा सल्ला प्रियंका चतुर्वेदी यांनी दिला आहे. त्याचवेळी श्रीलंका संघानेही या मालिकेतून माघार घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
Pakistan establishment is made up of a bunch of cowards who thrive on the blood of their innocent victims and get thrashed at the borders. Shame on them.
Good to see Afghanistan Cricket Board call off their series matches with Pakistan, maybe BCCI and GoI can take tips on how to… https://t.co/VzAvFcUOwi— Priyanka Chaturvedi🇮🇳 (@priyankac19) October 18, 2025
Learn from Afghanistan how to prioritize the country, says Priyanka Chaturvedi
महत्वाच्या बातम्या
- Vijay Vadettiwar : काॅंग्रेसवर टीका करणाऱ्या जरांगे पाटील यांचा बोलवता धनी कोण? विजय वडेट्टीवार यांचा सवाल
- Devendra Fadnavis : शेतकऱ्याला पुन्हा उभे करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माेठ्या पॅकेजची घाेषणा
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पुणेकरांसाठी नव्या संधींचे द्वार , मुरलीधर मोहोळ यांचे प्रतिपादन
- बनावट पासपोर्ट प्रकरणी नीलेश घायवळसह काढून देण्यासाठी मदत करणाऱ्या दोघांविरुद्धही गुन्हा