विशेष प्रतिनिधी
जालना : Manoj Jarange मराठा समाजासह सर्व समाजाला माहित होते की जरांगेंचं आंदोलन म्हणजे फुसका बार ठरणार आहे. जरांगेंच्या मुसक्या आवळण्याचे काम सुरु आहे. जरांगेंच्या बुडावर लाथ घालून बाहेर काढले पाहिजे, मराठा समाजात विद्वान माणसे आहेत. जरांगे यांच्यासारख्या बालिश माणसाकडे नेतृत्व ठेवू नये, असा हल्लाबोल ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी केला आहे.
57 लाख बोगस कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्याचे पाप काही महिन्यांपूर्वी शिंदे सरकारने केले आहे, असा थेट आरोप नवनाथ वाघमारे यांनी केला. ते म्हणाले, त्यांच्या पावलावर पाऊल टाकत देवेंद्र फडणवीस काम करीत असतील तर सहन करणार नाही. निवडणुकीच्या काळात आमचा डीएनए ओबीसी आहे, असं त्यांनी म्हटले होते. ओबीसी डीएनए आहे म्हणून पाठीत खंजीर खुपसत असाल तर ओबीसी यावर विचार करेल. Manoj Jarange
देवेंद्र फडणवीस दुटप्पी भूमिका घेतायेत का? फडणवीस जरागेंना घाबरतायत का? असा सवाल करून वाघमारे म्हणाले, बालिश नेत्याच्या दबावापोटी फडणवीस यांनी ओबीसी पाठीत खंजीर खुपसण्याचे काम करू नये. ओबीसीने सरकार दिलं असून, येणाऱ्या निवडणुकीत ओबीसींना विचार करावा लागेल.
संतोष देशमुख खून प्रकरणी धनंजय मुंडेवर आरोप होतायेत, आरोप सिद्ध झाल्यास सरकार राजीनामा घेईल. संतोष देशमुख यांच्या कुटुंबांला न्याय मिळाला पाहिजे, अशी दुटप्पी भूमिका सुरेश धस घेतायत, असं नवनाथ वाघमारे म्हणाले.
Manoj Jarange childish man, Navnath Waghmare attack