Bawankule : एव्हडे राजकारण कशासाठी? २७- २८ दिवसांपूर्वी धस – मुंडे भेट झाल्याचा बावनकुळे यांचा खुलासा

Bawankule : एव्हडे राजकारण कशासाठी? २७- २८ दिवसांपूर्वी धस – मुंडे भेट झाल्याचा बावनकुळे यांचा खुलासा

Bawankule

वृत्तसंस्था

मुंबई : Bawankule  भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांची मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी भेट घडवून आणल्याबद्दल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे संशयाने पहिले जात आहे. मस्साजोग ग्रामस्थांनी त्यांच्यावर संतापही व्यक्त केला आहे.. मात्र मुंडे आणि धस यांच्यात सुमारे २७ ते २८ दिवसांपूर्वीच भेट झाली आहे. या बैठकीचे राजकारण केलं जात आहे, हे दुर्दैवी आहे, अशी खंत बावनकुळे यांनी व्यक्त केली आहे.Bawankule

बावनकुळे म्हणाले, अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे आणि भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांच्यात 27 ते 28दिवसांपूर्वी भेट झालेली आहे. त्यावेळी आमचा एकच प्रयत्न होता की, संतोष देशमुख यांचे मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, यासाठी सर्वजणांनी मिळून काम केले पाहिजे. त्यात सुरेश धस, धनंजय मुंडे असो अथवा आम्ही असो. सर्वांनी मिळून त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला आहे.

Nilesh Rane : उद्धव ठाकरे यांची पक्ष सांभाळायची कुवत नाही, निलेश राणे यांची टीका

धनंजय मुंडे-सुरेश धस यांच्या भेटीमुळे संपूर्ण राज्यातून धस यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे. तसेच, विरोधी पक्षाकडूनही धस यांच्यावर आरोप केले जात आहेत. त्या भेटीमुळे राज्याचे संपूर्ण राजकारण ढवळून निघाले आहे. धनंजय मुंडे यांच्यासोबत कुठलीही भेट झालेली नाही. मी फक्त त्यांची विचारपूस करण्यासाठी चार दिवसांपूर्वी गेलो होतो, असा दावा धस यांनी केला आहे. मात्र, या चंद्रशेखर बावनकुळे तर 28 दिवसांपूर्वी भेट झाल्याचे सांगत आहेत,
धनंजय मुंडे यांच्या लोकांनीच भेटीची बातमी फोडल्याचा आरोप होत आहे. त्यावरही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, त्याने काय फरक पडतो. आमचं एकचं म्हणणं आहे की, आमचा फोकस काय आहे, तर संतोष देशमुख यांचा खून करणाऱ्यांना फाशीची देण्याचा आमचा प्रयत्न आहे. धनंजय मुंडे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रश्न आहे. त्यावर मी काही बोलू इच्छित नाही,

धस-मुंडे बैठकीचे आणि बोलण्याचे राजकारण केले जात आहे, हे दुर्दैवी आहे. उलट आमचा सर्वांचा एकच हेतू आहे की संतोष देशमुख खून प्रकरणातील एकही आरोपी सुटू नये. कुठलाही पुरावा शिल्लक राहू नये. या प्रकरणातील सर्व पुरावे कोर्टात गेले पाहिजेत आणि संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

Why politics today? Bawankule revealed that Dhas-Munde met 27-28 days ago

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023