विशेष प्रतिनिधी
जळगाव : जळगाव रेल्वे अपघातात आतापर्यंत 12 प्रवाशांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत. दरम्यान, अपघाताची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून दखल घेण्यात आली असून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली आहे..दावोस दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखाची मदत जाहीर केली आहे.Amit Shah
जळगावातील पाचोरा येथे काही प्रवाशांना बंगळूरू एक्स्प्रेसने उडवल्याची माहिती समोर आली आहे. परांडा रेल्वे स्थानकांच्या आधी काही कारणास्तव पुष्पक रेल्वे थांबली होती. याचवेळी एसी कोचच्या प्रवाशांमध्ये आग लागल्याची बातमी पसरली. ज्यानंतर भीतीने काही प्रवाशांनी पुष्पक एक्स्प्रेसमधून उड्या घेतल्या. पण याचवेळी समोरील रेल्वे ट्र्रॅकवरून जाणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसने त्या प्रवाशांना धडक दिल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातात आतापर्यंत 12 प्रवाशांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत. दरम्यान, अपघाताची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून दखल घेण्यात आली असून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली आहे.
महाराष्ट्र के जलगांव में हुआ रेल हादसा अत्यंत दुःखद है। इस संबंध में मुख्यमंत्री श्री @Dev_Fadnavis जी से बात कर हादसे की जानकारी ली। स्थानीय प्रशासन घायलों को हर संभव मदद पहुँचा रहा है। इस दुर्घटना में जान गँवाने वाले लोगों के परिजनों के प्रति गहरी संवेदनाएँ व्यक्त करता हूँ और…
— Amit Shah (@AmitShah) January 22, 2025
अमित शहा यांनी ट्वीट करताना म्हटले की, महाराष्ट्रातील जळगाव येथे घडलेला रेल्वे अपघात अत्यंत दुःखद आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून घटनेची माहिती घेतली आहे. स्थानिक प्रशासन जखमींना शक्य ती सर्व मदत पोहोचवत आहे. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या नागरिकांबद्दल मी संवेदना व्यक्त करतो आणि जखमी व्यक्ती लवकरात लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करतो.अमित शहा यांच्याशिवाय राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्वीट करत दुर्घटनेवर भाष्य केले आहे.
जळगाव जिल्ह्यातील दुर्दैवी अपघातातील मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक सहाय्य राज्य सरकारतर्फे करण्यात येईल आणि जखमींचा संपूर्ण खर्च सुद्धा राज्य सरकार करेल.
जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.#jalgaon pic.twitter.com/NHTUr1JTqw— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 22, 2025
देवेंद्र फडणवीस यांनी दावोस दौऱ्यावरून एक व्हिडीओ ट्वीट करताना म्हटले की, जळगाव जिल्ह्यातील पाचोरा नजीक अतिशय भीषण अशा प्रकारची दुर्घटना घडली आहे. ज्यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे, त्यांच्या कुटुंबाला 5 लाख रुपये मदत महाराष्ट्र सरकारच्या वतीने आम्ही देणार आहोत. तसेच जे जखमी आहेत, त्यांच्यावर मोफत उपचार करण्यात येतील. याशिवाय त्यांच्या नातेवाईकांना सर्व गोष्टी नीट मिळाव्यात याकरिता सर्वप्रकारचे निर्देश देण्यात आले आहेत. मंत्री गिरीश महाजन घटनास्थळी पोहचून सर्व प्रकारच्या गोष्टी हाताळत आहेत.
Amit Shah takes notice of train accident, Chief Minister helps 5 lakhs to relatives
महत्वाच्या बातम्या
- Chhagan Bhujbal छगन भुजबळ म्हणाले, जेलवारी आमच्या नशिबी होती ती झाली
- Jitendra Awad : खंडणी नव्हतीच तर हा होता इलेक्शन फंड, जितेंद्र आव्हाड यांचा पुन्हा धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल
- संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींसोबत वाल्मीक कराड असलेले सीसीटीव्ही फुटेज व्हायरल
- Sunil tatkare स्वतःपुरते पाहता, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडूनच अजित पवार, तटकरेंवर निशाणा