विशेष प्रतिनिधी
नागपूर : ‘मोदी संविधान बदलणार आहेत’ असा खोटा प्रचार करून काँग्रेसने लोकसभेत काही जागा जिंकल्या. त्याच पद्धतीने विधानसभेसाठी जनतेची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. मात्र, जनतेने काँग्रेसच्या चुकीच्या प्रचाराचा बदला घेतला, असा दावा महसूल मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लेख लिहून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप केला आहे. यावर बोलताना काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल करताना बावनकुळे म्हणाले, छोट्याच कालावधीत जनतेला समजले की काँग्रेस पक्ष हा बेईमान आहे. महाराष्ट्रातील जनतेने काँग्रेसचा खोटारडा प्रचार ओळखून भाजप महायुतीच्या विकासात्मक अजेंडाला मतदान दिले. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस व महाविकास आघाडीचे एकूण ३३ लाख मते कमी झाली. भाजप महायुतीचे मतदान ६९ लाखांनी वाढले.
बावनकुळे म्हणाले की, “जनतेने आमच्यावर विश्वास ठेवून निवडून दिलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आम्ही लोकांच्या हितासाठी काम करत आहोत. येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत आम्ही ५५ टक्क्यांच्या वर मतदान घेऊन महायुतीचा झेंडा महानगरपालिकांवर फडकवू. राज्यात येणाऱ्या काळात भाजपच्या विकास कामांना पाठिंबा देत लोक मतदान करतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अठरा पगड जातींसाठी जातनिहाय जनगणनेचा निर्णय घेतला असून, त्यामुळे सर्व समाजातील लोक मोदींच्या पाठीशी उभे आहेत, असेही बावनकुळे यांनी सांगितले. समाज कल्याण निधीबाबत काँग्रेस समाजात संभ्रम निर्माण करत असल्याचा आरोप करत त्यांनी स्पष्ट केले की, “सगळ्या समाजांसाठी राखीव बजेट आहे. काँग्रेस जनतेमध्ये चुकीची माहिती पसरवत आहे.”
नितेश राणे प्रकरणावर बोलताना बावनकुळे म्हणाले की, “राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. जर कोणावर अन्याय झाला असेल, तर तो दूर करण्याचे काम मुख्यमंत्र्यांच्याच माध्यमातून होईल. काही लोकांचे मन दुखावले असेल, याची दखल घेतली जाईल.
People took revenge for Congress’s wrong propaganda! Chandrashekhar Bawankule’s attack
महत्वाच्या बातम्या
- Girish Mahajan : तुम्ही राजकीय दलाली केल्यामुळेच उद्धवजींची सेना संपली, गिरीश महाजन यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार
- Rupali Chakankar : रुपाली चाकणकर काय रश्मिका मंदाना आहेत? सुषमा अंधारे यांचा सवाल
- Aditi Tatkare : सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण लाभ चार महिन्यांपूर्वीच बंद, आदिती तटकरे यांची माहिती
- Raju Shetti : शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना करणाऱ्या माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळात ठेवू नका, राजू शेट्टी यांची मागणी