विशेष प्रतिनिधी
मुंबई : पत्रकार परिषद सुरु असतानाच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी थेट शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांना फोन करून हिंदी सक्तीविरोधात दोन मोर्चे कशाला? मी आत्ताच ६ तारखेची घोषणा केली. मराठी माणसाच्या आंदोलनासाठी दोन वेगवेगळे मोर्चे निघणे हे बरे दिसत नाही. हे एकत्रित आंदोलन झाले तर त्याचा जास्त प्रभाव पडेल दोन्ही पक्षांच्या सहमतीनंतर आता ५ जुलै रोजी मुंबईतील गिरगाव चौपाटीपासून भव्य मराठी अस्मिता मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली आहे.
संजय राऊत यांनीच शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत याबाबत सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, “मी उद्धवजींसोबत पत्रकार परिषदेत होतो, त्याच वेळी राज ठाकरेंचा फोन आला. त्यांनी सांगितले की, ‘मी ६ जुलै रोजी हिंदी सक्तीच्या विरोधात मोर्चा आयोजित केला आहे. मात्र, मला शिवसेना ठाकरे गटाच्या ७ तारखेला होणाऱ्या मोर्चाची माहिती मिळाली. एकाच विषयावर दोन वेगळे मोर्चे योग्य वाटत नाहीत. आपण एकत्र आलो तर प्रभावी आसंदेश जाईल.’”
राऊत म्हणाले, “मी ही बाब तत्काळ उद्धवजींना सांगितली. त्यांनी कोणताही अहंकार न ठेवता सकारात्मक भूमिका घेतली आणि म्हटले की, ‘आपण ७ ऐवजी ५ किंवा ६ जुलैलाच संयुक्त मोर्चा घेऊया.’ त्यानंतर राज ठाकरेंना कळवले आणि शेवटी ५ जुलै ही तारीख निश्चित करण्यात आली. हा मोर्चा कोणत्याही राजकीय अजेंड्यावर आधारित नसेल. यात कोणताही पक्षीय झेंडा नसेल. फक्त मराठी माणसाचा आवाज असेल. सकाळी १० चा प्रस्ताव असला तरी वेळेबाबत अंतिम निर्णय पुढे घेतला जाईल.” Raj Thackeray
राज ठाकरे यांनी गुरुवारीच गिरगाव चौपाटीपासून हिंदी सक्तीविरोधात आणि मराठी शिक्षणाच्या आग्रहासाठी भव्य मोर्चाची घोषणा केली होती. त्यांच्या म्हणण्यानुसार, “हा केवळ राजकीय पक्षांचा मोर्चा न राहता साहित्यिक, कलाकार, विद्यार्थी, सर्वसामान्य मराठीजन यांचा असावा.” या घोषणेनंतरच हा संवाद आणि एकत्रीकरणाचा प्रयत्न सुरू झाला.
दरम्यान, संजय राऊतांनी हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर कठोर भूमिका घेत म्हणाले, “आम्हाला हिंदी भाषेशी वैर नाही, पण महाराष्ट्रात शालेय शिक्षणावर हिंदी जबरदस्तीने लादली जातेय, जी आमच्या मुलांना मानसिकदृष्ट्या आणि अभ्यासदृष्ट्या झेपणार नाही. त्रिभाषा सूत्राच्या नावाखाली ही जबरदस्ती केली जात आहे. विशेषतः गुजरात राज्याला या योजनेतून वगळण्यात आले आहे, ही बाब अधिक खटकणारी आहे.”
राऊत पुढे म्हणाले की, “मराठी भाषा कृती समितीचे प्रमुख दीपक पवार आणि इतर संस्थांनी नुकतीच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी दोघांनीही या विषयावर एकसंध भूमिका मांडली. त्यामुळे हा मोर्चा फक्त जनआंदोलन नव्हे, तर मराठी अस्मितेचे ऐक्याचे दर्शन घडवणारा ठरेल.
राज ठाकरे, उद्धव ठाकरे, मराठी भाषा कृती समिती, साहित्यिक, समाजसेवक, शिक्षणतज्ज्ञ, मराठी भाषिक संस्था आणि हजारो मराठीप्रेमी नागरिक ५ जुलै रोजी एकत्रित येणार असून, हा मोर्चा महाराष्ट्राच्या भाषिक आणि सांस्कृतिक आत्मसन्मानाचे प्रतीक ठरणार आहे. Raj Thackeray
Raj Thackeray direct call to Sanjay Raut during press conference; Announcement of joint march on July 5
महत्वाच्या बातम्या
- Girish Mahajan : तुम्ही राजकीय दलाली केल्यामुळेच उद्धवजींची सेना संपली, गिरीश महाजन यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार
- Rupali Chakankar : रुपाली चाकणकर काय रश्मिका मंदाना आहेत? सुषमा अंधारे यांचा सवाल
- Aditi Tatkare : सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण लाभ चार महिन्यांपूर्वीच बंद, आदिती तटकरे यांची माहिती
- Raju Shetti : शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना करणाऱ्या माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळात ठेवू नका, राजू शेट्टी यांची मागणी