Dino Morea : डिनो मोरियाने तोंड उघडले तर…एकनाथ शिंदे यांचा शिवसेना ठाकरे गटाला इशारा
डिनो मोरियाने तोंड उघडले तर कितीतरी लोकांचा मोरया होईल. म्हणून जे काचेच्या घरात राहतात, ते दुसऱ्यांच्या घरावर दगड मारत नाहीत
डिनो मोरियाने तोंड उघडले तर कितीतरी लोकांचा मोरया होईल. म्हणून जे काचेच्या घरात राहतात, ते दुसऱ्यांच्या घरावर दगड मारत नाहीत
राज्यात गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेल्या हनीट्रॅप प्रकरणाचा पेनड्राईव्ह आपल्याकडे आहे. पान मला ते दाखवून कोणाचे चरित्रहनन करायचे नाही असे सांगत एवढ्या गंभीर प्रश्नामध्ये सरकार साधे निवेदनही करत नाहीत. या राज्यात नेमके काय सुरु आहे? हेच आम्हाला कळत नाही आहे, असा संताप काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी व्यक्त केला.
लोहगाव विमानतळावरून सध्या ३७ शहरांसाठी विमानसेवा उपलब्ध असून, यात लवकरच १५ नवीन मार्गांची भर पडणार आहे. नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली
“एस.टी. बस चालकाचा मुलगा आपल्या कर्तृत्वाच्या बळावर राज्य विधानपरिषदेचा विरोधी पक्षनेता होतो, ही बाब अभिमानास्पदच आहे. कोणी कुठेही जन्माला आला तरी आपल्या कर्तुत्वाने मोठा होऊ शकतो, ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने आणि लोकशाहीने सामान्यांना दिलेली मोठी देणगी आहे,” अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कार्याचा गौरवाने उल्लेख केला
नागपूरमधील सध्या अस्तित्वात असलेल्या विधानसभेच्या जागेवर नवीन सात मजल्याचे संकुल उभारण्यात येणार असून हे विस्तारीकरण करताना सध्याच्या इमारतीची ऐतिहासिक शैली अबाधित राहिल, याची काळजी घेण्यात येणार आहे.
गिरणी कामगारांना मुंबईबाहेर घरे देण्याच्या राज्य सरकारच्या प्रस्तावाला कामगारांच्या वारसांकडून तीव्र विरोध झाला होता.
पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराच्या उभारणीमुळे महाराष्ट्र आणि भारत सागरी महासत्ता होण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करीत असून हा प्रकल्प केवळ बंदर नव्हे तर एक आर्थिक क्रांती घडवून आणणारा केंद्रबिंदू ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्रात औद्योगिक वीजदर अन्य राज्यांच्या तुलनेत सर्वात कमी होणार आहेत. नवीन टॅरिफनुसार सध्या महाराष्ट्राचा दर ₹8.32 आहे, जो पुढील टप्प्यात ₹7.38 रुपयांवर येणार आहे.
दारूचा टँगो नावाचा ब्रँड कोणाचा आहे हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे अजित पवार यांच्याकडे उत्पादन शुल्क विभाग असेल तर हितसंबंधांचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे त्यांच्याकडील उत्पादन शुल्क विभाग काढून घेण्याची मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
“विदर्भातील कोणताही गरीब माणूस ‘झुडपी जंगल’ जमिनींच्या नावाखाली बेघर होणार नाही, त्याला संपूर्ण संरक्षण देण्याचं काम सरकार करेल, कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही असं स्पष्ट आश्वासन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत दिले.
दीपक काटे मला दोन तीन वेळा भेटला होता. काटेच्या कुठल्याही वाईट कृत्याला आमचे समर्थन नाही. समाजा-समाजात तेढ निर्माण करण्याचा आमचा धंदा नाही. आम्ही संस्कार आणि संस्कृतीने काम करणारे कार्यकर्ते आहोत. आम्ही विचारांची लढाई लढणारे आहोत. रस्त्यावर लढाई लढणारे नाहीत,असे उत्तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशध्यक्ष प्रवीण गायकवाड याना दिले आहे.