विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका, म्यानमार किंवा बांगलादेशप्रमाणे रस्त्यावरच्या हिंसाचारातून सरकार उलथवण्याचा मार्ग भारताने कधी स्वीकारला नाही. युद्धे, दहशतवाद, नक्षलवाद, अतिरेकी विचारसरणी यांचा सामना करूनही लोकशाही हस्तांतरण नेहमीच मतपेटीतून झाले.मात्र अलीकडच्या काळात काँग्रेसशी निगडीत असलेल्या काही घटकांनी घेतलेला कलाटणी देणारा हिंसक मार्ग धोकादायक भासत आहे. सलग तीन लोकसभा निवडणुकीत (२०१४, २०१९, २०२४) नरेंद्र मोदींना हरवण्यात अपयशी ठरलेल्या काँग्रेसने आता निराशेतून ‘नेपाळ-शैली’तील हिंसक आंदोलनांचे महिमागान सुरू केल्याचा आरोप होत आहे. Congress
तरुणांना भडकवून रस्त्यावर आणण्याचा, अराजकतेला खतपाणी घालण्याचा आणि देशात अराजक पसरवण्याचा प्रयत्न सुरू आहे. नेपाळमध्ये अलीकडेच झालेली भीषण हिंसा याचे ताजे उदाहरण आहे. भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाच्या नावाखाली सुरु झालेली चळवळ लवकरच दंगलीत बदलली. पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी पदाचा राजीनामा द्यावा लागला, १९ जणांचा मृत्यू झाला, आणि संसद, हॉटेल्स, सरकारी इमारती आगीत जळून खाक झाल्या. माजी पंतप्रधान प्रचंड, देउबा, झलनाथ खनाल यांच्या घरांवर हल्ले झाले, मंत्र्यांना मारहाण करण्यात आली. इतकेच नव्हे, तर पशुपतिनाथ मंदिरालाही लष्कराच्या सुरक्षेत घ्यावे लागले. राजधानी काठमांडू भीषण अराजकतेत ढकलली गेली.
हीच ‘क्रांती’ काँग्रेस समर्थक सोशल मीडियावर गौरविताना दिसत आहेत.मोदींच्या विजयाला पचवू न शकलेल्या काँग्रेसने निवडणूक पराभवानंतर आत्मपरीक्षण करण्याऐवजी कटुता वाढवली. अलीकडेच काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनाते यांनी “Their Kids vs Your Kids” अशा शीर्षकाचा व्हिडिओ ‘एक्स’ (X) वर शेअर केला. या व्हिडिओमध्ये भाजप नेत्यांच्या मुलांचे ऐषआरामी जीवन आणि पोलिसांकडून लाठीमार सहन करणाऱ्या आंदोलनकर्त्या तरुणांची तुलना करण्यात आली. हा संदेश उघड होता: तरुणांना राग आणणे, मत्सर निर्माण करणे आणि हिंसाचाराच्या मार्गावर ढकलणे. हा व्हिडिओ काँग्रेसच्या नेत्यांनी आणि सोशल मीडिया समर्थकांनी मोठ्या प्रमाणात शेअर केला.
नेपाळच्या दंगलींनी कसा देश उध्वस्त होतो, अर्थव्यवस्था कोसळते आणि राजकीय पोकळी निर्माण होते, हे स्पष्ट केले आहे. अशा मॉडेलचे भारतासाठी गौरव करणारे काँग्रेसचे प्रयोग हे केवळ निराशेचे द्योतक नाहीत, तर लोकशाहीविरोधी घातक खेळ आहेत. भारताने आजवर हिंसेच्या मार्गाला न जुमानता लोकशाहीला बळकटी दिली आहे. अशा वेळी अराजकतेचे बीज पेरणाऱ्यांना जनतेने ओळखणे आणि नाकारण्याची गरज आहे.
Congress’s Desperate Plot: Sowing Anarchy to Destroy Democracy
महत्वाच्या बातम्या
- Yogesh Kadam : ठाकरे बंधुंचे मराठी मतदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरणार ; योगेश कदम
- round of 11th admission : अकरावी प्रवेशाची विशेष फेरी, चार महिन्यांनंतरही संपेना प्रवेश प्रक्रिया
- ward structure in Pune : पुण्यातील प्रभाग रचनेवर विरोधक व नागरिकांचा रोष !
- Manoj Jarange : ओबीसी समाजाला मिळाले दुष्ट विचारांचा नेता, मनोज जरांगे यांचा हल्लाबोल