विशेष प्रतिनिधी
जाकार्ता : इंडोनेशियातील भारताच्या संरक्षण सल्लागारांनी एका परिसंवादात केलेल्या वाक्वित्याची मोडतोड करून भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ मध्ये फायटर जेट गमावल्याची फेक न्यूज काही देशविरोधी माध्यमांनी चालविली आहे. इंडोनेशियामधील भारतीय दूतावासाने स्पष्टीकरण संरक्षण सल्लागाराच्या विधानाचे माध्यमांनी चुकीच्या पडद्याने सादरीकरण केल्याचे म्हटले आहे.
इंडोनेशियामधील भारतीय दूतावासाने रविवारी अधिकृत स्पष्टीकरण देताना स्पष्ट केले की, संरक्षण सल्लागाराने केलेले भाष्य काही माध्यमांनी संदर्भाच्या बाहेर जाऊन मांडले आहे. त्या सादरीकरणाच्या मूळ उद्देशाची चुकीची मांडणी करण्यात आली आहे.आम्ही काही मीडिया रिपोर्ट्स पाहिले आहेत, जे संरक्षण सल्लागाराने एका सेमिनारमध्ये केलेल्या सादरीकरणावर आधारित आहेत. त्यांच्या वक्तव्यांचा अर्थ चुकीच्या पद्धतीने लावला गेला आहे आणि मीडिया रिपोर्ट्समध्ये सादरीकरणाचा हेतू आणि मांडणी चुकीची दर्शवण्यात आली आहे.
दूतावासाने पुढे स्पष्टीकरण दिले की, “त्या सादरीकरणामध्ये हे स्पष्टपणे मांडले गेले होते की, भारतीय सशस्त्र दल हे निवडून आलेल्या नागरी राजकीय नेतृत्वाच्या अधीन काम करतात. आपल्या शेजारील काही देशांप्रमाणे लष्कर सर्वसत्ताधीशनाही. ऑपरेशन सिंदूरचे प्रमुख उद्दिष्ट दहशतवादी केंद्रांची पायाभूत संरचना नष्ट करणे हेच होते आणि ही कारवाई नियंत्रित स्वरूपाची होती.
१० जून रोजी इंडोनेशियातील एका विद्यापीठात आयोजित एका सेमिनारमध्ये भारतीय नौदलातील कॅप्टन आणि इंडोनेशियासाठी भारताचे संरक्षण सल्लागार कॅप्टन शिव कुमार यांनी ‘वायुसेनेचे सामर्थ्य व भारत-पाक संघर्ष’ या विषयावर सादरीकरण दिले होते.काही माध्यमांच्या मते, त्यांनी असे म्हटले की, “ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारतीय वायुदलाने काही लढाऊ विमानं गमावली आणि हे नुकसान केवळ राजकीय नेतृत्वाने लादलेल्या निर्बंधांमुळेच झाले . विशेषतः पाकिस्तानी लष्कराच्या मुख्यालयावर किंवा त्यांच्या एअर डिफेन्सवर हल्ला करण्यास बंदी होती.”
या विधानानंतर भारतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध चर्चांना उधाण आले. काही माध्यमांनी याचा अर्थ भारतीय राजकीय नेतृत्वाने सैन्यावर दबाव आणला, असा लावला. मात्र भारतीय दूतावासाने हे पूर्णतः फेटाळून लावत, सादरीकरणाची मुळ भूमिका आणि राष्ट्रीय धोरण रचनेचा आदर्श दाखवण्याचा उद्देश स्पष्ट केला आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’ ही कारवाई २०२५ मध्ये भारताने पाकिस्तानवर केलेल्या दहशतवादविरोधी हवाई कारवाईचा एक भाग होती. या ऑपरेशनमध्ये नियंत्रण रेषेच्या पलीकडे असलेल्या दहशतवादी तळांवर हल्ले करण्यात आले. भारत सरकारने यावर स्पष्टपणे सांगितले होते की, ही कारवाई ‘नॉन-एस्कलेटरी’ (सैन्य संघर्ष वाढविणारी नसलेली) असून, फक्त दहशतवादविरोधी लक्ष्यांवर मर्यादित होती.
द वायर सारख्या वृत्त संकेतस्थळाने तर राजकीय नेतृत्वाच्या बंधनांमुळे ऑपरेशन सिंदूर मध्ये भारतीय लष्कराला फायटर विमाने गमवावी लागल्याच्या बातम्या दिल्या आहेत.
Dismantling of India’s defense advisors’ statement in Indonesia and fake news of fighter jets lost in ‘Operation Sindoor’
महत्वाच्या बातम्या
- Harshawardhan Sapkal : गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदी सक्ती नाही तर महाराष्ट्रातच कशासाठी? काँग्रेसचा सवाल
- Ashish Shelar काँग्रेसने आणले त्रिभाषा सूत्र, उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात मान्यता, आशिष शेलार यांचा दावा
- filming devotees : भक्तांच्या खासगी आयुष्याचे चित्रीकरण करणाऱ्या भोंदू बाबाला अटक
- Shiv Sena : नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाला गळती, महानगरप्रमुख शिंदे गटात