विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये गैरव्यवहार झाल्याचे आरोप महाविकास आघाडीकडून सातत्याने केला जात आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वाक्यात उत्तर देत निशाणा साधला आहे. जेव्हा एकच विनोद पुन्हा पु्न्हा ऐकवला जातो तेव्हा त्यावर हसू येत नाही, असे ते म्हणाले.
आज लोकसभा विरोधी पक्षनेते व काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाच्या खासदार सुप्रिया सुळे व शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्यासह घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकींबाबत सविस्तर आकडेवारी देऊन तीन महत्त्वाचे प्रश्न निवडणूक आयोगाला केले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर यासंबंधी पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी “जेव्हा एकच विनोद पुन्हा पु्न्हा ऐकवला जातो तेव्हा त्यावर हसू येत नाही (जब एक ही चुटकुला बार-बार सुनाया जाए तो उसपर हंसा नहीं करते!),” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. विशेष म्हणजे फडणवीस यांनी ही पोस्ट काँग्रेसचे नेत राहुल गांधी यांना टॅग करत केली आहे.
या आरोपांवरील सर्व उत्तरं निवडणूक आयोगानं दिलेली आहेत. किती मतदार वाढले? ते कुठे वाढले ? ते कसे वाढले? निवडणूक आयोगानं सांगितलं आहे. आता राहुल गांधींची जी तयारी चाललीय ती दिल्लीमध्ये प्रचंड मोठा त्यांचा पराभव होणार असल्यामुळे त्याचं कव्हर फायरिंग करण्याचा प्रयत्न ते करतायत. मी वारंवार सांगतो जोपर्यंत ते आत्मचिंतन करणार नाहीत आणि आपल्या मनाची खोटी समजूत करुन घेतील तोपर्यंत जनतेचं समर्थन त्यांना कधीही मिळणार नाही, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
Fadnavis’s target on Rahul Gandhi
महत्वाच्या बातम्या
- अंजली दमानिया यांच्यावर धनंजय मुंडे दाखल करणार फौजदारी अब्रुनुकसानीचा खटला
- पंतप्रधान नरेंद्र मोदी कुंभमेळ्यात, दिल्लीत आज मतदान
- Anjali Damania : अंजली दमानिया यांनी वाचला धनंजय मुंडेंच्या भ्रष्टाचाराचा पाढा, कृषीमंत्री असताना दुपटीहून दराने खरेदी
- Supriya Sule : पीकविमा योजनेतील भ्रष्टाचार प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई, खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रश्नावर केंद्रीय कृषिमंत्र्यांचे आश्वासन