भारतीय प्रेरणांनी लिहिणारे कालजयी साहित्यिक एस एल भैरप्पा यांचे निधन

भारतीय प्रेरणांनी लिहिणारे कालजयी साहित्यिक एस एल भैरप्पा यांचे निधन

S. L. Bhyrappa

विशेष प्रतिनिधी

बेंगळूरू : भारतीय प्रेरणांनी लिहिणारे कालजयी साहित्यिकपद्मश्री, पद्मभूषण कन्नड भाषेतील एक प्रसिद्ध भारतीय कादंबरीकार, तत्त्वज्ञ आणि पटकथा लेखक एस. एल. भैरप्पा यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते.

त्यांच्या भारतीय सांस्कृतिक आणि तात्विक परंपरांवरील सखोल ज्ञानामुळे आणि बालपणीच्या ग्रामीण व शहरी अनुभवांमुळे ते ओळखले जातात. त्यांच्या ‘वंशवृक्ष’, ‘पर्व’, ‘तंडा’, ‘काठ’ आणि ‘सार्थ’ यांसारख्या अनेक कादंबऱ्या मराठीसह इतर भारतीय भाषांमध्ये अनुवादित झाल्या आहेत मराठी वाचकांमध्ये त्या लोकप्रिय आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना साहित्याच्या क्षेत्रात अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

एस.एल. भैरप्पा यांचा जन्म २० ऑगस्ट १९३१ रोजी हासन जिल्ह्यातील संतेशीवारा या गावात झाला. .भैरप्पा यांनी त्यांच्या लेखनाद्वारे तत्त्वज्ञान, इतिहास, सामाजिक संघर्ष, संस्कृती, व्यक्तित्वशास्त्र या विषयांना कन्नड कादंबरीमध्ये विलक्षण पद्धतीने मांडले. त्यांची काही प्रमुख कादंबऱ्या आहेत:

भैरप्पा यांना पद्म भूषण (2023), पद्म श्री (2016), सरस्वती सम्मान, साहित्य अकादमी पुरस्कार आदी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.

भैरप्पा यांच्या निधनाच्या बातमीने साहित्य आणि सांस्कृतिक वर्तुळात शोककळा पसरवली आहे. भारताच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करत, त्यांना “एक बलाढ्य व्यक्तिमत्व” आणि “निडर व कालजयी विचारक” म्हटले. इतर साहित्यिक, राजकीय आणि सामाजिक नेत्यांनीही श्रद्धांजली वाहिली आहे.

Legendary Indian-Inspired Author S. L. Bhyrappa Passes Away

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023