पंतप्रधान मोदींचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा, ₹35,440 कोटींच्या योजनांचा शुभारंभ; ‘धान धान्य कृषी योजना’ आणि ‘डाळ आत्मनिर्भरता अभियान’ सुरू

पंतप्रधान मोदींचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा, ₹35,440 कोटींच्या योजनांचा शुभारंभ; ‘धान धान्य कृषी योजना’ आणि ‘डाळ आत्मनिर्भरता अभियान’ सुरू

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी नवी दिल्लीतील भारतीय कृषी अनुसंधान संस्था (IARI) येथे देशभरातील शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी ₹35,440 कोटींच्या दोन महत्त्वाच्या योजनांचा शुभारंभ केला. PM Modi

या योजनांमध्ये ₹24,000 कोटींची ‘प्रधानमंत्री धान धान्य कृषी योजना’ आणि ₹11,440 कोटींची ‘डाळ आत्मनिर्भरता अभियान’ (Mission for Self-Reliance in Pulses Production) या दोन महत्वाच्या उपक्रमांचा समावेश आहे.

या योजनांद्वारे पीक विविधीकरणाला प्रोत्साहन, साठवण क्षमता वाढविणे, सिंचन सुविधा विस्तार आणि डाळ उत्पादनातील आत्मनिर्भरता साध्य करणे हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

पंतप्रधानांनी कृषी, पशुसंवर्धन, मत्स्यपालन आणि अन्नप्रक्रिया क्षेत्रातील ₹5,450 कोटींच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन केले. तसेच ₹815 कोटींच्या नव्या प्रकल्पांनाही मंजुरी देण्यात आली.
या प्रकल्पांत कोल्ड चेन सुविधा, इन-विट्रो फर्टिलायझेशन (IVF) लॅब्स, फिश फीड प्लांट्स, दुग्ध उद्योग पायाभूत सुविधा यांचा समावेश आहे. याशिवाय पंतप्रधानांनी विविध शासकीय योजनांचे लाभार्थी असलेल्या शेतकऱ्यांना प्रमाणपत्रे वाटप केले आणि त्यांच्याशी थेट संवाद साधला.



प्रधानमंत्री धान धान्य कृषी योजनेचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे कृषी उत्पादकता वाढविणे, टिकाऊ शेती पद्धतींचा अवलंब वाढविणे, पंचायती व तालुका स्तरावर पिकानंतरच्या साठवण सुविधांची निर्मिती,सिंचन व्यवस्था सुधारणा,दीर्घकालीन व अल्पकालीन कर्जसुविधांची उपलब्धता करणे आहे. ही योजना सुरुवातीला देशातील 100 जिल्ह्यांमध्ये राबविली जाणार आहे.

‘डाळ आत्मनिर्भरता अभियान’चा उद्देश देशातील डाळ उत्पादनाची उत्पादकता आणि क्षेत्रफळ वाढविण्यावर केंद्रित आहे. त्याचबरोबर खरेदी, साठवण, प्रक्रिया या मूल्यसाखळीचे बळकटीकरण आणि उत्पादनातील तोटे कमी करणे हेही या योजनेचे उद्दिष्ट आहे.

कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान मोदींनी भारतरत्न जयप्रकाश नारायण आणि भारतरत्न नानाजी देशमुख यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करताना म्हटले,“आमचे सरकार शेतकरी, पशुपालक आणि मत्स्यव्यवसायिकांच्या कल्याणासाठी दिवस-रात्र प्रयत्न करत आहे. आज दिल्लीहून हजारो कोटींच्या योजनांचा शुभारंभ करताना मला अभिमान वाटतो. कृषी हा भारताच्या विकासकथेचा आधारस्तंभ आहे. शेतीने काळानुसार प्रगती केली पाहिजे आणि सरकारने तिचे सातत्याने समर्थन केले पाहिजे. दुर्दैवाने, पूर्वीच्या सरकारांनी शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले, त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था कमकुवत झाली. पण 2014 नंतर आम्ही भारताच्या कृषी क्षेत्राचे आधुनिकीकरण आणि सशक्तीकरण सुरू केले.”

पंतप्रधान मोदींनी सुरू केलेल्या या दोन योजनांमुळे शेतकऱ्यांना उत्पादन, सिंचन, साठवण आणि डाळ उत्पादनात स्वावलंबन मिळणार आहे. यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवे बळ मिळेल आणि देशाच्या कृषी विकासाला वेग मिळण्याची अपेक्षा आहे.

PM Modi’s big relief to farmers, launching schemes worth ₹35,440 crore; ‘Dhaan Dhanya Krishi Yojana’ and ‘Dal Atmanirbharta Abhiyan’ launched

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023