विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : काँग्रेसने 1965 च्या काळात पहिल्यांदा त्रिभाषा सूत्र आणले. त्यानंतर 1968 ला काँग्रेसच्या काळातील शासन निर्णय झाला. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण कारवाईची सुरुवात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच झाली. खासदार संजय राऊतांनी ठाकरे यांना कितीही पडद्याआड टाकण्याचा प्रयत्न केला तरी ते होऊ शकत नाही, अशी टीका राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केली.
कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना शेलार म्हणाले Ashish Shelar
लोकशाहीत प्रत्येक जण आपापली भूमिका मांडू शकतो आणि बदलू शकतो, प्रत्येकाला निर्णय घेण्याचा अधिकार आहे. राज्यात केवळ मराठीला सक्ती आहे अन्य कोणत्याही भाषेला नाही, हिंदी अन्य भाषांबरोबर पर्याय म्हणून उपलब्ध आहे. सुकाणू समितीचा अहवाल आणि भाषेतील तज्ज्ञ व्यक्तींच्या अभ्यासानंतरच राज्यात त्रिभाषा सूत्र आलेलं आहे. विद्यार्थ्यांच्या हितासाठी त्रिभाषा सूत्र आहे, यावर मतमतांतर असू शकतात, मात्र विद्यार्थ्यांचे हित टाळता येत नाही, Ashish Shelar
काँग्रेसने पाचवी आणि सहावी, सातवीला जी हिंदी सक्ती केली, त्याला उद्धव ठाकरेंनी पाठिंबा दिला. मात्र भाजपाने आता ही सक्ती काढून पर्याय दिलाय, याचे उत्तर संजय राऊत देऊ शकतील का अन्यथा मी त्यांना यासंदर्भात ट्युशन द्यायला तयार असल्याचे सांगून आशिष शेलार म्हणाले, हिंदी सक्तीवरून जे काही सुरू आहे ते अनाकलनीय आणि अनाठायी आहे. भाजपाची भूमिका स्पष्ट आहे. मराठीसाठी कट्टर आहोत, मात्र हिंदुस्तानी भाषेचे खुनी नाही. Ashish Shelar
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या वर्धा ते गोवा शक्तिपीठ महामार्गाला राज्यभरातून विरोध होत आहे, याबाबत विचारलं असता ते म्हणाले की, शक्तिपीठ महामार्गासंदर्भातील भूमिका आम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवू, त्यांचंही म्हणणं ऐकून घेऊ, आमचा विकासाचा चेहरा हा मानवी चेहरा आहे, कोणालाही डावलून आणि त्रास देऊन विकासाची कल्पना आम्ही केलेली नाही, विकासासाठी आग्रही असलो तरी सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची आमची भूमिका आहे. राज्यांच्या पिढ्यानपिढ्या उपयोगी येणाऱ्या गोष्टींच्या बाबतीतला हा निर्णय आहे, यामध्ये अर्थ खात्याने केलेल्या टिप्पणीचा शासनाने विचार केला असल्याचे शेलार शेलार यांनी सांगितले.
Congress brought the three-language formula, it was approved during Uddhav Thackeray’s tenure as Chief Minister, claims Ashish Shelar
महत्वाच्या बातम्या
- Girish Mahajan : तुम्ही राजकीय दलाली केल्यामुळेच उद्धवजींची सेना संपली, गिरीश महाजन यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार
- Rupali Chakankar : रुपाली चाकणकर काय रश्मिका मंदाना आहेत? सुषमा अंधारे यांचा सवाल
- Aditi Tatkare : सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण लाभ चार महिन्यांपूर्वीच बंद, आदिती तटकरे यांची माहिती
- Raju Shetti : शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना करणाऱ्या माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळात ठेवू नका, राजू शेट्टी यांची मागणी