म्हणे औरंगजेब पवित्र व्यक्ती होता, काँग्रेसच्या माजी आमदाराची मुक्ताफळे

म्हणे औरंगजेब पवित्र व्यक्ती होता, काँग्रेसच्या माजी आमदाराची मुक्ताफळे

Asif shaikh

विशेष प्रतिनिधी

मालेगाव : औरंगजेब हे एक पवित्र व्यक्ती होते. त्यांनी टोपी शिवून दोन वेळचे जेवण कमावले आणि प्रामाणिक जीवन जगले, अशी मुक्ताफळे उधळीत मालेगावचे काँग्रेसचे माजी आमदार आसिफ शेख यांनी पुन्हा एकदा क्रूरकर्मा औरंगजेबाचे महिमामंडन केले आहे. त्यांनी केलेल्या या विधानामुळे राज्यात पुन्हा एकदा औरंगजेब या विषयावरून गदारोळ उठण्याची शक्यता आहे. Asif shaikh

मालेगावात मायनॉरिटी डिफेन्स कमिटीच्या वतीने आयोजित केलेल्या उत्तर महाराष्ट्र चिंतन शिबिरात आसिफ शेख म्हणाले, औरंगजेब हे एक पवित्र व्यक्ती होते. त्यांनी टोपी शिवून दोन वेळचे जेवण कमावले आणि प्रामाणिक जीवन जगले. ते सर्वधर्म समभाव ठेवणारे आणि तसेच वागणारे होते. मात्र केवळ राजकारणासाठी त्यांना बदनाम केले जात आहे. आज त्यांच्या नावावर मतदान मिळवण्याचे आणि समाजात ध्रुवीकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे योग्य नाही.



आपल्या विधानावर ठाम असल्याचे सांगत पुढे आसिफ शेख म्हणाले, जे आहे ते आहे, आम्ही संविधानाला मानणारे आहोत आणि या देशावर प्रेम करणारे आहोत, असे त्यांनी म्हटले आहे. परंतु आता त्यांनी केलेल्या या विधानामुळे राज्यात पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आसिफ शेख यांनी इंडियन सेक्युलर लार्जेस्ट असेंबली ऑफ महाराष्ट्र (इस्लाम) या राजकीय पक्षाची निर्मिती केली असून त्यांनी 2024 ची विधानसभा निवडणूकही लढवली होती. आसिफ शेख हे पूर्वी कॉंग्रेस पक्षात होते. कॉंग्रेस पक्षात असताना ते आमदार देखील होते. त्यानंतर मध्यंतरीच्या काळात त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात देखील प्रवेश केला होता. विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचा राजीनामा दिला व अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती.

विधानसभा निवडणुकीत आसिफ शेख यांचा पराभव झाला होता. एमआयएमचे उमेदवार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांनी आसिफ शेख यांचा 162 मतांनी पराभव केला होता. तसेच आसिफ शेख यांनी स्थापन केलेल्या पक्षावर देखील आक्षेप नोंदवण्यात आला होता.

यापूर्वीऔरंगजेबाचे कौतुक करणारे समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांचे सदस्यत्व अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. अधिवेशन संपेपर्यंत त्यांना विधानभवन आवारात येण्यासदेखील बंदी घालण्यात आली आहे. अबू आझमी यांनी विधानभवन आवारात औरंगजेब किती चांगला शासक होता, अशा आशयाचे वक्तव्य केले होते.

आता विधिमंडळाचे सदस्य नसलेल्या आसिफ शेख यांच्यावर काय कारवाई होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

https://youtu.be/DcJhA7JECN4

Former Congress MLA’s said that Aurangzeb was a holy man ; Asif shaikh

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023