विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यात सध्या शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात युतीची चर्चा सुरू आहे. मात्र मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे अनेक शिलेदार ठाकरे गटावर तुटून पडत आहेत. आता मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे (Shalini Thackeray) यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ठाकरे गटाने यापूर्वी केलेल्या धोक्याची आठवण करून दिली आहे.
शालिनी ठाकरे (Shalini Thackeray) यांनी म्हटले आहे की, बाळासाहेबांबद्दल अपमानास्पद बोलणारे आता मराठी माणसाच्या युतीबद्दल बोलतायत. या नव शिवसैनिकांनी आधी याची माहिती घ्यावी की, 2014 आणि 2022 साली मराठी माणूस एकत्र होऊ नये यासाठी कोणी मिठाचा खडा टाकला होता? उत्तर मिळाले की महाराष्ट्राला कळवा.
कारण 2014 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांनी एकत्र लढावे, असा प्रस्ताव मनसेकडूनच ठेवण्यात आला होता. पण त्यास शिवसेना (आताचा ठाकरे गट) पक्षाने विरोध करत स्वतंत्र लढण्याची भूमिका घेतली होती. त्यामुळे आता मनसे नेत्यांकडून याबाबतची आठवण ठाकरे गटाला करून देण्यात येत आहे.
महाराष्ट्र हितासाठी, मराठी माणसाच्या भल्यासाठी जुने वाद विसरून जाईन”, असे वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले होते. तर, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील राज यांना प्रतिसाद दिला आहे. पाठोपाठ मनसे व शिवसेनेचे (ठाकरे) कार्यकर्ते आणि स्थानिक नेते एकमेकांशी संवाद साधताना दिसू लागले आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या युतीची चर्चा जोर धरू लागली आहे. असे असताना या दोन्ही भावांमधील बहुचर्चित युती अद्यापही अनिश्चित आहे. राज आणि उद्धव ठाकरे दोघेही युतीच्या शक्यतांबाबत वक्तव्ये करत असले तरी दोघांनीही अद्याप युतीसंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. तर आता एकीकडे ठाकरे गट या युतीसाठी सकारात्मक असताना दुसरीकडे मात्र मनसे नेत्यांकडून याला विरोध दर्शविण्यात येत आहे.
MNS again reminds Thackeray group of old betrayal
महत्वाच्या बातम्या
- म्हणे औरंगजेब पवित्र व्यक्ती होता, काँग्रेसच्या माजी आमदाराची मुक्ताफळे
- सत्ताधाऱ्यांवर वादग्रस्त वक्तव्य, संदीप देशपांडे यांच्यावर हक्क भंग कारवाई होणार?
- Abu Azmi : अबू आझमी ही महाराष्ट्राला लागलेली कीड, सरकारने कडक कारवाई करावी, आनंद परांजपे यांची मागणी
- Nitesh Rane : हिंदुंमध्ये भांडण म्हणजे जिहाद्यांना मदत, नितेश राणे यांनी राज ठाकरे यांना सुनावले