Rahul Gandhi : मतचोरी’ सारखे घाणेरडे शब्द वापरून खोटी कथा रचण्याचा प्रयत्न, निवडणूक आयाेगाने राहुल गांधी यांना सुनावले

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : मतचोरी’ सारखे घाणेरडे शब्द वापरून खोटी कथा रचण्याचा प्रयत्न करणे हा कोट्यवधी भारतीय मतदारांवर थेट हल्ला आहे, असे निवडणूक आयोगाने काॅंग्रेस नेते राहुल गांधी यांना सुनावले आहे. मतदार यादीत फेरफार आणि मतचोरीच्या काँग्रेस नेते राहुल गांधी आणि विरोधकांच्या आरोपांना निवडणूक आयोगाने प्रत्युत्तर दिले आहे.


जन आक्रोश नाही हा तर सत्ता गेली म्हणून मन आक्रोश, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उध्दव ठाकरेंवर हल्लाबाेल


आयोगाने म्हटले आहे की, या प्रकारचे आरोप करणे म्हणजे लाखो निवडणूक कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणावर हल्ला आहेत. १९५१-१९५२ मध्ये झालेल्या भारतातील पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपासून ‘एक व्यक्ती, एक मत’ हा कायदा लागू आहे. जर कोणाकडे पुरावा असेल की एखाद्या व्यक्तीने प्रत्यक्षात निवडणुकीत दोनदा मतदान केले आहे, तर त्याने देशातील सर्व मतदारांना कोणत्याही पुराव्याशिवाय ‘चोर’ म्हणण्याऐवजी हा पुरावा प्रतिज्ञापत्रासह निवडणूक आयोगाकडे सादर करावा.

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी म्हटले होते की, “फक्त एक जागा नाही तर अनेक जागा आहेत जिथे मतदार यादींमध्ये छेडछाड केली जात आहे. हे राष्ट्रीय पातळीवर पद्धतशीरपणे केले जात आहे. अशी एकच नाही तर अमर्याद प्रकरणे आहेत. पिक्चर अद्याप समोर आलेला नाही. निवडणूक आयोगाला हे माहित आहे आणि आम्हालाही. पूर्वी कोणताही पुरावा नव्हता, पण आता आमच्याकडे पुरावे आहेत. आम्ही संविधानाचे रक्षण करत आहोत. एक व्यक्ती एक मत हा संविधानाचा पाया आहे. ‘एक व्यक्ती एक मत’ अंमलात आणणे हे निवडणूक आयोगाचे कर्तव्य आहे, परंतु त्यांनी तसे केले नाही. आम्ही हे करत आलो आहोत आणि करत राहू.

कर्नाटकच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी (सीईओ) काँग्रेस नेते राहुल गांधी यांना नोटीस पाठवून त्यांच्या मतचोरीच्या विधानाचे पुरावे मागितले आहेत. ७ ऑगस्ट रोजी राहुल गांधी यांनी महादेवपुरा विधानसभा मतदारसंघात १ लाखाहून अधिक मते चोरीला गेल्याचा आणि एका महिलेने दोनदा मतदान केल्याचा आरोप केला होता.

राहुल गांधी यांनी मतदार यादीतील अनियमिततेवर १ २२ पानांचे सादरीकरण दिले. राहुल यांनी कर्नाटकची मतदार यादी स्क्रीनवर दाखवली आणि मतदार यादीत संशयास्पद मतदार असल्याचे सांगितले. महाराष्ट्राचे निकाल पाहिल्यानंतर निवडणूक चोरीला गेल्याचा आमचा संशय पक्का झाला. मशीन रीडेबल मतदार यादी न देऊन, आम्हाला खात्री पटली की निवडणूक आयोगाने भाजपशी संगनमत करून महाराष्ट्राची निवडणूक चोरली आहे, असा आराेप त्यांनी केला हाेता.

Election Commission tells Rahul Gandhi to use dirty words like ‘vote theft’ to create false narrative

महत्वाच्या बातम्या