विशेष प्रतिनिधी
मुंबई : Devendra Fadnavis राज्यात सध्या कथित हिंदी सक्तीवरून सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावनिकतेच्या राजकारणावर खंत व्यक्त करत मराठी विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. “भावनेच्या आहारी जाऊन आपण आपल्या मुलांचे शैक्षणिक नुकसान करत आहोत का?” असा मुद्दा त्यांनी मांडत वास्तवाचा विचार करण्याचे आवाहन केले आहे.Devendra Fadnavis
मुख्यमंत्री म्हणाले की, “मराठी आणि हिंदीमध्ये जर स्पर्धा झाली, तर पहिली पसंती मराठीलाच मिळेल. मराठी हीच आमची मातृभाषा आहे आणि ती कोणाशीही स्पर्धा करत नाही. मात्र, आजच्या काळात विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पातळीवर स्पर्धा करावी लागते. अशा वेळी नवीन शैक्षणिक धोरणानुसार तीन भाषा शिकणं अनिवार्य आहे. जर एखादा विद्यार्थी तिसरी भाषा शिकत नसेल, तर त्याला आवश्यक क्रेडिट्स मिळणार नाहीत. त्यामुळे तो गुणवत्तेमुळे मागे पडू शकतो.”
मुख्यमंत्री म्हणाले, “आज आपण इंग्रजीला विरोध करत नाही, मग भारतीय भाषांमधील हिंदीला विरोध का? एकीकडे परकीय भाषा आपण सहज स्वीकारतो, पण स्वदेशी हिंदीला विरोध करत आहोत हे दुर्दैवी आहे. त्रिभाषा सूत्र ही कुणावरही सक्ती नाही, ती विद्यार्थ्यांच्या बुद्धी विकासाच्या दृष्टिकोनातून तयार करण्यात आली आहे. संशोधनानुसार लहान वयात मुलं अनेक भाषा सहज शिकू शकतात.”
फडणवीस यांनी विरोधकांवर राजकीय हेतूने मुद्दा उचलल्याचा आरोप करताना म्हटलं, “महानगरपालिका निवडणुका नसत्या, तर कदाचित यावर इतका गहजब झाला नसता. या मुद्यावर टीका करणाऱ्यांनीच आधी शिक्षण धोरण स्वीकारले होते. आज त्याच धोरणावर टीका करणे म्हणजे स्वतःच्याच निर्णयाचा विरोध नाही का? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी माशेलकर समितीचा अहवाल स्वीकारला आणि मराठी, इंग्रजी, हिंदी या तीनही भाषा शिकवाव्यात असा निर्णय घेतला होता. आता त्या धोरणालाच विरोध करणं म्हणजे केवळ राजकीय सोयीचा मुद्दा आहे. या धोरणात माशेलकर, मुणगेकर, सुखदेव थोरात यांच्यासारख्या तज्ज्ञांचा सहभाग होता. त्यांच्यावरच जर प्रश्नचिन्ह निर्माण होत असेल, तर तो मूळ मुद्दा नाही, तर भावनिक दिशाभूल आहे.”
फडणवीस म्हणाले, “राज ठाकरे हे माझे चांगले मित्र आहेत. पण याचा अर्थ प्रत्येक मुद्द्यावर एकमत असणारच असे नाही. जर सगळ्यांचे विचार सारखे असते, तर सगळेच एका पक्षात राहिले असते. माझी भूमिका वेगळी असू शकते आणि त्यांच्या भूमिका वेगळ्या असू शकतात.”
हिंदी शिकवण्याबाबत फडणवीस यांनी गुजरातचा दाखला देत स्पष्ट केले की, “गुजरातमध्ये देखील तिसऱ्या इयत्तेपासून हिंदी शिकवली जाते. तिथेही विद्यार्थ्यांना संस्कृत किंवा इतर भाषांचे पर्याय दिलेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांनी आधी इतर राज्यांचा अभ्यास करावा.”
मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “ही आमच्या प्रतिष्ठेची लढाई नाही. आम्ही कोणत्याही एका भाषेची सक्ती करत नाही. पण विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी आवश्यक असलेल्या निर्णयांना विरोध करण्याऐवजी त्याचा अभ्यास करणे आणि योग्य तो निर्णय घेणे हे आपल्याच मुलांच्या भविष्यासाठी गरजेचे आहे.”
Don’t harm Marathi students in the politics of emotion, appeals Chief Minister Devendra Fadnavis
महत्वाच्या बातम्या
- Harshawardhan Sapkal : गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदी सक्ती नाही तर महाराष्ट्रातच कशासाठी? काँग्रेसचा सवाल
- Ashish Shelar काँग्रेसने आणले त्रिभाषा सूत्र, उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात मान्यता, आशिष शेलार यांचा दावा
- filming devotees : भक्तांच्या खासगी आयुष्याचे चित्रीकरण करणाऱ्या भोंदू बाबाला अटक
- Shiv Sena : नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाला गळती, महानगरप्रमुख शिंदे गटात