‘नक्षलमुक्त भारता’च्या दिशेने पाऊल; छत्तीसगड-तेलंगणा सीमावर्ती कर्रेबुट्टलू डोंगरात ३१ नक्षलवाद्यांचा खात्मा

‘नक्षलमुक्त भारता’च्या दिशेने पाऊल; छत्तीसगड-तेलंगणा सीमावर्ती कर्रेबुट्टलू डोंगरात ३१ नक्षलवाद्यांचा खात्मा

Naxalites

विशेष प्रतिनिधी

बिजापूर : ‘नक्षलमुक्त भारत’ या संकल्पनेच्या दिशेने भारताने मोठे यश मिळवले आहे. छत्तीसगड व तेलंगणा सीमावरील कर्रेबुट्टलू डोंगर परिसरात झालेल्या इतिहासातील सर्वात मोठ्या नक्षलविरोधी मोहिमेत ३१ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. या मोहिमेतील यशाबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सुरक्षा दलांचे अभिनंदन केले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले की, केवळ २१ दिवसांत पार पडलेल्या या ऑपरेशनमध्ये एकाही जवानाचा मृत्यू न होता ३१ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. कर्रेबुट्टलू डोंगर हा नक्षलवाद्यांसाठी PLGA बटालियन-१, DKSZC, TSC, व CRC यांसारख्या प्रमुख संघटनांचा गढ मानला जात होता. येथेच नक्षलवाद्यांना प्रशिक्षण दिले जात होते. रणनीती आखली जात होती. त्याचबरोबर शस्त्रनिर्मिती केली जात होती.

बिजापूरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत सीआरएफचे महासंचालक ज्ञानेंद्र प्रताप सिंग, छत्तीसगडचे पोलीस महासंचालक अरुण देव गौतम यांनी या ऑपरेशनची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, एप्रिल २१ ते मे ११, २०२५ या कालावधीत झालेल्या २१ चकमकींत सुरक्षा दलांनी ३१ नक्षलवाद्यांचे मृतदेह व ३५ शस्त्रे हस्तगत केली आहेत. त्यात १६ महिला नक्षलवादी आहेत.

सध्या ओळख पटलेल्या २८ नक्षलवाद्यांवर एकूण १.७२ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर होते. मृतांमध्ये PLGA बटालियन, CRC कंपनी आणि तेलंगणा राज्य समितीशी संबंधित अनेक वरिष्ठ कमांडरचा समावेश असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

सुकमा आणि बिजापूर या नक्षलग्रस्त भागांमध्ये गेल्या दोन वर्षांत सुरक्षा दलांनी अनेक नव्या छावण्या स्थापन करत वर्चस्व प्रस्थापित केले. त्यामुळे दबावाखाली आलेल्या नक्षलवाद्यांनी ६० किमी लांब व २० किमी रुंद अशा अवघड भूप्रदेश असलेल्या कर्रेबुट्टलू डोंगरात आश्रय घेतला होता. याठिकाणी सुमारे ३००-३५० सशस्त्र नक्षलवादी आधुनिक शस्त्रांसह उपस्थित होते.

केंद्रीय आणि राज्य गुप्तचर यंत्रणांच्या समन्वयातून विशेष पथक तयार करण्यात आले. मानव आणि तांत्रिक गुप्त माहितीच्या आधारे तपशीलवार योजना आखून, वेळोवेळी फौजफाटा बदलत २१ एप्रिलपासून मोहीम सुरू करण्यात आली.

गृहमंत्री शहा यांनी म्हटले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ३१ मार्च २०२६ पर्यंत देश नक्षलमुक्त करण्याचा आमचा निश्चय आहे. त्यांनी CRPF, DRG आणि STFच्या जवानांचे कौतुक करत म्हटले की, खराब हवामानात आणि अवघड डोंगराळ भागात या जवानांनी दाखवलेले शौर्य संपूर्ण देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

A step towards ‘Naxal-free India’; 31 Naxalites killed in Karrebuttlu hills on Chhattisgarh-Telangana border

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023