बाहेरच्यांना दोष देऊन उपयोग नाही, मुख्य समस्या काँग्रेसच्या घरातच, बिहारमधील दारुण पराभवानंतर काँग्रेस नेत्यांची आत्मपरीक्षणाची मागणी

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल काँग्रेससाठी मोठा धक्का ठरला. राज्यात पक्षाची ताकद वाढवण्याचा सारा प्रचार असूनही काँग्रेसला अपेक्षित जागा मिळाल्या नाहीत. काही नेत्यांनी पराभवासाठी पुन्हा एकदा निवडणूक आयोग, विरोधकांचे ‘तंत्र’ किंवा बाह्य कारणे जबाबदार धरली तरी पक्षातील अनेक नेत्यांनी ती भूमिका फेटाळली. त्यांच्या मते, “मुख्य समस्या काँग्रेसच्या घरातच आहे.” Congress

बिहार निवडणुकीतील दारुण पराभवानंतर काँग्रेसमध्ये जोरदार असंतोष पसरला आहे. काही नेत्यांनी निवडणूक आयोगाला दोष देण्याचा प्रयत्न केला तरी बरेच नेते मानतात की समस्या पक्षाच्या आतच आहे.

निकाल घोषित होताच अनेक नेत्यांनी परिस्थिती गंभीर असल्याचे म्हणून थेट आणि कठोर निर्णय घेण्याचा आग्रह धरला आहे. आता फक्त पारंपरिक चर्चा आणि विश्लेषण करून भागणार नाही, सत्य स्वीकारून योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे.”



काँग्रेस खासदार शशी थरूर यांनीही पार्टीला प्रामाणिक आणि सखोल आढावा घ्यावा असा आग्रह धरला. त्यांचे म्हणणे आहे की एनडीची आघाडी मोठी दिसत आहे. चुका ओळखून धोरणात्मक व संघटनात्मक त्रुटींचे अभ्यास करून खरोखरचे आत्मपरीक्षण आवश्यक आहे. फक्त बैठका घेऊन विचार करणे पुरेसे ठरणार नाही तर कारवाईची रूपरेषाही आखावी लागेल असे ते म्हणाले.

पक्षातील अनेक नेते यावेळी केवळ बाह्य कारणे सांगून बाजू मांडण्यापेक्षा सत्य समोर आणून कडक बदल करावे असे आवाहन करत आहेत. आता काँग्रेससाठी आत्मपरीक्षणाची, रणनीती बदलण्याची आणि जनतेचा पुन्हा विश्वास प्राप्त करण्याची गरज आहे.

काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूस समोर आली आहे. काही नेत्यांनी स्थिती “अत्यंत गंभीर” असल्याचे म्हटले आणि पक्षाने आता बहाणे न शोधता स्वतःच्या उणिवांकडे बघून मोठे निर्णय घ्यावेत, अशी आग्रही भूमिका घेतली आहे.

Congress leaders after crushing defeat in Bihar

महत्वाच्या बातम्या