विशेष प्रतिनिधी
मुंबई: Chandrakant Khaire सध्या डाऊन फॉल सुरू असला तरी आपल्याला निवडून येण्यासाठी तडजोड करावी लागेल, नाही तर भाजपा पुन्हा डोक्यावर बसेल, अशी भीती शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केली.Chandrakant Khaire
चंद्रकांत खैरे म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू (उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे) एकत्र आले, तर त्यामुळे मोठा फरक पडेल आणि त्यामुळे मुंबई महापालिकेवर विजय मिळू शकेल, हे कोणीही नाकारू शकत नाही, ही मुंबई शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आहे. त्यांच्यामुळेच मुंबई वाचलेली आहे, नाही तर या लोकांनी मुंबई कधीच तोडली असती.Chandrakant Khaire
तेव्हाचे काँग्रेसचे सरकार असेल किंवा आताचे केंद्र सरकार असेल मुबई कशी काबीज करायची? असा त्यांचा प्रयत्न असतो. पण मराठी माणूस हा मराठी नेतृत्वाकडे पहात आहे, त्यामुळे दाव्याने सांगतो दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई महापालिका ताब्यात येऊ शकते, असा विश्वाद खैरे यांनी व्यक्त केला.
महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या काँग्रेसलाही फटकारताना खैरे म्हणाले, काँग्रेसने अजूनही युतीचा निर्णय घेतला पाहिजे आणि आघाडी धर्म पाळला पाहिजे. काँग्रेस पक्ष स्वतंत्र लढला तर कसा मजबूत होणार? असा सवाल त्यांनी केला. बिहारमध्ये किती जागा लढल्या पण एकच जागा आली. राहुल गांधी यांनी जी मतचोरी दाखवली त्याचा काहीच परिणाम बिहारमध्ये झाला नाही, असेही खैरे यांनी म्हटले आहे.
Chandrakant Khaire admits that the downfall of the Thackeray group has begun.
महत्वाच्या बातम्या
- विराेधकांचा निवडणूक आयाेगाच्या नावाने शिमगा सुरू..संजय राऊत, राेहित पवारांचे मतचाेरीचे आराेप
- ताडाेबातील वाघ सह्याद्रीच्या घाटावर, तीन नर आणि पाच मादी वाघांचे स्थानांतर
- विराेधकांचा निवडणूक आयाेगाच्या नावाने शिमगा सुरू..संजय राऊत, राेहित पवारांचे मतचाेरीचे आराेप
- ताडाेबातील वाघ सह्याद्रीच्या घाटावर, तीन नर आणि पाच मादी वाघांचे स्थानांतर




















