विशेष प्रतिनिधी
मुंबई : Uddhav Thackeray एकनाथ शिंदेंना महायुतीत कुणीही विचारत नाही. सध्या त्यांना (शिंदे) तिकडे कोणती किंमत देत नाही. भाजप आता सरळ सांगत आहे की, फक्त नंबर 1 ला महत्त्व असते, नंबर 2 वगैरे काहीही नसते, असा टाेला शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.Uddhav Thackeray
पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात बाेलताना उध्दव ठाकरे म्हणाले, दिशाभूल झालेले अनेकजण पक्षाला सोडून गेले होते. पण आता ते पुन्हा परत येत आहेत. या सर्वांचे मी स्वागत करतो. मधल्या काळात सर्वांच्या डोळ्यांत धूळफेक करण्यात आली होती. नाही म्हटले तरी तुमच्या सारखे सर्व कट्टर शिवसैनिक त्याला थोडेसे बळी पडले होते. आता एकेक परत येत आहेत. हवेत प्रदूषण आहे, तसे राजकारणातही प्रदूषण आहे. पण जी धुळफेक होती, ती आता स्पष्ट होत आहे. गद्दारी करताना कारण काय दिले होते की, उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले.Uddhav Thackeray
उद्धव ठाकरे काँग्रेससोबत गेल्यामुळे आम्ही युती तोडली. पण आता त्यांनी त्यांचा गत काही वर्षांतील इतिहास पाहावा. त्यांना कल्याण डोंबिवलीची सभा आठवेल. या सभेत ते म्हणाले होते की, त्यात भाजप शिवसेना व शिवसैनिकांवर कसा अत्याचार करतोय म्हणून मी त्या मंत्रिमंडळात त्यांच्या मांडीला मांडी लावून बसू शकत नाही, त्यासाठी मी राजीनामा देत आहे.
असे नाटक करणारा एक आपण पाहिला होता. त्यानंतर त्यांनी अजित पवारांचे कारण दिले. अजित पवार आम्हाला निधी देत नाहीत. त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत बसू शकत नाही. काँग्रेससोबत बसू शकत नाही असे ते म्हणाले होते. पण आता ते त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसले होते. आता त्यांचे केवळ विसर्जन होण्याचे राहिले आहे
उद्धव ठाकरे महाविकास आघाडी स्थापन करण्याबाबत म्हणाले, काँग्रेससोबत शिवसेना गेली नाही. त्यावेळी भाजपने दगाबाजी केली. विश्वासघात केला. त्यामुळे त्यांना धडा शिकवण्यासाठी आपण महाविकास आघाडी स्थापन केली. पण आता नगरपालिकांच्या निवडणुकीत त्यांच्याच पोस्टरवर सोनिया गांधींचे फोटो आहेत. जे मला शिव्या देत होते, त्यांच्या पोस्टरवर आनंद दिघे यांच्या बाजूला सोनिया गांधींचा फोटो दिसून येत आहे. ही सगळी लाचारी सत्तेसाठी सुरू आहे. एकतर त्यांना तिकडे कोणती किंमत देत नाही. भाजप आता सरळ सांगत आहे की, फक्त नंबर 1 ला महत्त्व असते, नंबर 2 वगैरे काहीही नसते. पण त्याहीपेक्षा तुम्ही जेव्हा शिवसेनेत होता तेव्हाची वट आजही ठाण्यात आपण ठेवली आहे.
आज भाजपचे कार्यकर्ते शिवसैनिकांना मारहाण करत आहेत. पण हे हू का चू करू शकत नाहीत. मग याला लाचारी नाही तर काय म्हणायचे? पण मला त्याची चिंता नाही. कारण, ठाणे हा शिवसेनेचे बालेकिल्ला आहे. हा बालेकिल्ला अबाधित राखण्याचे काम तुम्हाला करायचे आहे, असे ठाकरे म्हणाले.
शिवरायांचा पवित्र भगवा व मशाल हे आपले निवडणूक चिन्ह वेगवेगळे ठेवण्याचे करताना ठाकरे म्हणाले, आपल्या भगव्यावर मशाल आहे. पण मी सर्वांना एक विनंती करतो की, भगवा आणि मशाल वेगळी ठेवा. कारण, शिवरायांचा भगवा हा तसाच पवित्र राहिला पाहिजे. त्याच्यावर कोणतेही चित्र छापू नका. कारण, भाजपचा तोच डाव आहे. त्यांनी त्यांच्या फडक्यावर हिरवा रंग लावलेलाच आहे. पण आपल्या हिंदू व मराठी जनतेची फसवणूक व्हावी, कुठेतरी गोंधळ व्हावा यासाठी ते भगव्यावर वेगवेगळी चित्रे लावून हे लोकांच्या मनात गोंधळ निर्माण करत आहेत.
आपला पवित्र भगवा हाच मशालीसारखा दिसला पाहिजे. लांबून पाहिले तर भगवाच मशालीसारखा फडकताना दिसतो. त्यामुळे आपली मशाल छत्रपती शिवरायांची, हिंदुत्त्वाची, महाराष्ट्र धर्माची आणि शिवसेनाप्रमुखांनी आपल्या हातात दिलेली मशाल घेऊन पुढे चला. मध्ये येणारी सर्व जळमटे व विरोधक या मशालीच्या तेजानेच भस्म होतील. हा मला आत्मविश्वास आहे.
No one should ask Eknath Shinde in the Mahayuti, Uddhav Thackeray said
महत्वाच्या बातम्या
- भिकारपणा शब्द वापरल्यावरून अजित पवारांनी मागितली जाहीर माफी
- Dilip Walse Patil : माझं राज्यातल वजन थोडं कमी झालं, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केली खंत
- ‘दुसऱ्याची पोरं आपली सांगू नका’, नाशिकमध्ये गुलाबराव पाटलांची अजित पवारांवर जोरदार टीका
- Comedian Kunal Kamra : कॉमेडियन कुणाल कामराने पुन्हा काढली खोडी, टी-शर्टवर कुत्र्याचा फोटो आणि ‘RSS’ सारखे दिसणारे अक्षर