Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Chief Minister
मुंबई

Chief Minister : फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणी एसआयटी स्थापन:महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वात होणार तपास, निष्पक्ष चौकशीसाठी मुख्यमंत्र्यांचा निर्णय

फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाचा तपास आता विशेष तपास पथकामार्फत करण्यात येणार आहे. या प्रकरणाचे गांभीर्य आणि संवेदनशीलता लक्षात घेऊन, राज्याचे पोलिस महासंचालक यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने एसआयटी स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्देशानुसार, हा संपूर्ण तपास एका महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालील विशेष तपास पथकाकडून केला जाईल, जेणेकरून प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी व्हावी.

Priyank Kharge’
देश-विदेश

Priyank Kharge’ : प्रियंक खर्गे यांच्या वक्तव्यावरून वाद, आसमच्या तरुणांचा अपमान झाल्याचा आरोप; मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांची तीव्र प्रतिक्रिया

कर्नाटकचे मंत्री प्रियंक खर्गे यांनी केलेल्या विधानामुळे असममध्ये संतापाची लाट उसळली आहे. “गुजरातमध्ये काय आहे? तिथे कौशल्य आहे का? असममध्ये काय आहे? तिथे कौशल्य आहे का?” असे वक्तव्य करून त्यांनी संपूर्ण राज्यातील युवकांचा आणि औद्योगिक क्षमतेचा अवमान केल्याचा आरोप होत आहे. या वक्तव्यावर मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी तीव्र शब्दांत खर्गे यांना प्रत्युत्तर दिले असून, “आसमच्या तरुणांचा अपमान करणाऱ्या खर्गे यांना लाज वाटली पाहिजे. हे विधान केवळ अज्ञान नव्हे तर गर्विष्ठतेचे उदाहरण आहे,” असे सांगितले.

Harshavardhan Sapkal
मुंबई

Harshavardhan Sapkal : पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर पोलीस पाळत ठेवत आहेत. मुंबईतील नाना चौकातील सर्वोदय आश्रमात सपकाळ यांचा मुक्काम असतो, त्या आश्रमात पोलीस सातत्याने पाळत ठेवत आहेत. आज सकाळी एका साध्या वेशातील पोलिसांने थेट बेडरुममध्ये घुसून टेहळणी आणि चौकशी केली. हे आतापर्यंत तिस-यांदा घडले आहे. कोणाच्या आदेशाने आमच्यावर पाळत ठेवली जात आहे?,असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

Lawyers
पुणे

Lawyers : राज्यभरातील वकील ३ नोव्हेंबरपासून संपावर

वकिलांवरील होणारे हल्ले रोखण्यासाठी तसेच वकील संरक्षण कायद्याच्या मागणीसाठी राज्यातील वकिलांची शिखर संघटना असलेल्या बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाकडून सोमवारी (दि. ३) कामकाजापासून अलिप्त राहणार असल्‍याचा ठराव झाला आहे.

महाराष्ट्र

कर्जमाफीसाठी चालढकल म्हणजे शेतकऱ्यांच्या मृत्यूला निमंत्रण, उद्धव ठाकरे यांचा इशारा

शेतकऱ्यांचे दु:ख पाहून राजकारण बाजूला ठेवा. कर्जमाफीसाठी चालढकल करणे म्हणजे त्यांच्या मृत्यूला निमंत्रण देणे आहे. ज्यांचा देशाच्या अन्नपुरवठ्यावर जीव आहे

महाराष्ट्र

Bacchu Kadu : बच्चू कडू यांनी नाकारला तोडगा, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार

Bacchu Kadu : राज्य सरकारने 30 जून पर्यंत शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेण्याचे आश्वासन दिले असले तरी प्रहार संघटनेचे नेते आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी तोडगा नाकारला आहे.

Sanjay Raut
महाराष्ट्र

Sanjay Raut : संजय राऊत यांच्या प्रकृतीत बिघाड, दोन महिने सार्वजनिक जीवनापासून दूर राहणार

शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या प्रकृतीत गंभीर बिघाड झाला आहे. त्यामुळे त्यांनी 2 महिने सार्वजनिक जीवनापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या निगराणीखाली उपचार सुरू आहेत.

Manoj Jarange
महाराष्ट्र

30 जून पर्यंत शेतकरी मरेल ना? समिती नको तातडीने मदत देण्याची मनोज जरांगे यांची मागणी

पुन्हा एकदा सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे, कर्जमाफी होणारच नाही. 30 जून पर्यंत शेतकरी मरेल ना? त्यांना तातडीच्या मदतीची गरज आहे. तोपर्यंत शेतकऱ्यांने जगायचे कसे? असा सवाल करत मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

Devendra Fadnavis
मुंबई

Devendra Fadnavis : कर्जमाफीचा निर्णय 30 जून 2026 पूर्वी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांच्या आक्रमक आंदोलनानंतर अखेर राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती देण्यासाठी दिशेने मोठे पाऊल टाकले आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी शासनाने ‘उच्चाधिकार समिती’ची स्थापना केली आहे. या 9 सदस्यीय समितीच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्र्यांचे प्रमुख आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 30 जून 2026 पूर्वी कर्जमाफीचा निर्णय घेण्याचे आम्ही ठरवले आहे, असे ठरविल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Election Commission
देश-विदेश

Election Commission : बिहार निवडणुकांपूर्वी निवडणूक आयोगाचा कडक बंदोबस्त; मादक पदार्थ, पैसे व मोफत वाटपांवर कारवाई सुरू

आगामी बिहार विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्थेचा आढावा घेत शेजारील राज्ये आणि नेपाळ सीमेवरून अंमली पदार्थ, पैसे, शस्त्रे आणि मोफत वस्तूंची तस्करी रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत.

देश-विदेश

माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन मंत्रिमंडळात; निवडणुकीपूर्वी काँग्रेसचा मुस्लीम मतदारांना चुचकरण्याचा प्रयत्न

तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांच्या मंत्रिमंडळात माजी भारतीय क्रिकेट कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांचा समावेश होणार असल्याची अधिकृत घोषणा होताच राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. अझरुद्दीन यांचा शपथविधी शुक्रवारी दुपारी १२.१५ वाजता होणार आहे.

पुणे

अजित पवार विचारणार रूपाली चाकणकर यांना जाब, महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात भूमिकेवरून संताप

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर फलटण येथील महिला डॉक्टर प्रकरणात घेतलेल्या भूमिकेवरून अडचणीत आल्या आहेत.