Rohit Pawar : मराठा आंदोलकांची गैरसोय कशी होईल याचे सरकारकडून नियोजन, रोहित पवार यांचा आरोप
लाखो आंदोलक मुंबईत आले असून राहण्याची, खाण्या-पिण्याची काहीच व्यवस्था सरकारकडून करण्यात आलेली नाही. आंदोलनस्थळी आंदोलकांना सुविधा उपलब्ध करून द्यायच्या असतात आणि हेच लोकशाहीचे खरे तत्व आहे. परंतु राज्य सरकार आंदोलकांची गैरसोय कशी होईल याचे नियोजन करत असेल तर ते हुकुमशाहीचे लक्षण म्हणावे लागेल, असा अरोप शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे.











