Rajesh Kshirsagar : लोकहिताचा असणारा शक्तिपीठ महामार्ग होणारच, आमदार राजेश क्षीरसागर यांचा ठाम विश्वास
लोकहिताचा असणारा शक्तिपीठ महामार्ग होणारच आहे. ज्या ६२ गावांतून महामार्ग जात आहे यातील सर्वाधिक गावांतील शेतकरी शक्तिपीठ महामार्गाचे समर्थन करत आहेत. कोल्हापूरचा विकास होऊ नये, यासाठी काही राजकारणी प्रयत्न करत आहेत. त्यांचा विरोध डावलून लोकांच्या हितासाठी शक्तिपीठ मार्ग होणारच असल्याचा ठाम विश्वास आमदार राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला.











