Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Ram Satpute
महाराष्ट्र

Ram Satpute : मोहिते पाटलांनी संस्था खानदानी समजून विकून खाल्ल्या, राम सातपुते यांचा हल्लाबोल

सहकार वाचवण्याचे तत्वज्ञान सांगतात. पण, मोहिते पाटलांनी माळशिरस तालुक्यातील सूतगिरणी, कुक्कुटपालन अशा संस्था खानदानी समजून विकून खाल्ल्या, असा हल्लाबोल माळशिरसचे भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार राम सातपुते यांनी केला आहे.

harshwardhan sapkal
मुंबई

Harshwardhan Sapkal : सरसंघचालक दलित, मुस्लीम किंवा महिला कधी करणार? हर्षवर्धन सपकाळांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना सवाल

संविधानाचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यातील सलोख्याचे संबंध जगजाहीर आहेत. नेहरुंनी बाबासाहेबांना सन्मानाने देशाच्या पहिल्या कायदा मंत्रीपदाची जबाबदारी दिली. आज काँग्रेस पक्षाचा अध्यक्षही दलित समाजाचा आहे पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सरसंघचालक दलित, मुस्लीम किंवा महिला कधी करणार? असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नरेंद्र मोदी यांना केला आहे.

Raj Thackeray
मुंबई

Raj Thackeray : डॉ. बाबासाहेब म्हणाले होते मुंबई मराठी भाषिकांचीच, राज ठाकरे यांनी करून दिली आठवण

Raj Thackeray : मुंबईत गुजराती किंवा इतर भाषिक आले म्हणजे मुंबईची मूळ ओळख पुसली गेली असं होत नाही, मुंबईची मूळ ओळख ही मराठी भाषिकांचा प्रांत अशीच आहे आणि ती बदलता येणार नाही, असे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते अशी आठवण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी करून दिली.

Mehul Choksi
देश-विदेश

Mehul Choksi : पंजाब नॅशनल बँकेत घोटाळा, मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये अटक

पंजाब नॅशनल बँकेत 13,500 कोटी रुपयांचा घोटाळा करून देशाबाहेर पसार झालेल्या हिरे व्यापारी मेहुल चोक्सीला अखेर बेल्जियम पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या विनंतीवरून करण्यात आली असून सीबीआयच्या (CBI) सूचनेवरून अटकेची कार्यवाही झाली आहे.

Sadavarte
महाराष्ट्र

Sadavarte : खुलासा करा अथवा माफी मागा, सदावर्ते यांनी उदयनराजे यांना सुनावले

थोरले प्रतापसिंह महाराज यांनी स्त्री शिक्षणाची मूहुर्तमेढ रोवली असा दावा उदयनराजेंनी केला होता. महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी थोरले प्रतापसिंह महाराजांचे अनुकरण केले होते, असं उदयनराजे भोसले म्हणाले. यावरुन आता गुणरत्न सदावर्ते यांनी उदयनराजेंवर निशाणा साधला आहे. अभ्यास करावा लागतो, इतिहास वाचावा लागतो, अशी टीका करत गुणरत्न सदावर्ते यांनीउदयनराजे यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे.

Devendra Fadnavis
महाराष्ट्र

Devendra Fadnavis : गुरु स्वतःसाठी नाही तर समाजासाठी लढतो हा आदर्श पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायचाय, देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

कोणताही गुरु स्वतःसाठी न लढता समाजासाठी लढतो, हा आदर्श त्यांनी आपल्यासमोर ठेवला आहे . हा आदर्श पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे काम आपल्याला करावयाचे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

Yogi Adityanath
देश-विदेश

Yogi Adityanath : व्हाेट बँक नष्ट होईल म्हणूनच वक्फ कायद्याच्या विराेधात हिंसाचार, याेगी आदित्यनाथ यांचा आराेप

वक्फ कायद्याच्या नावाखाली लोकांना भडकवले जात आहे, मुर्शिदाबादमध्ये हिंदूंना घराबाहेर काढून मारण्यात आले. या लोकांना भीती वाटते, की जर गरिबांना उंच इमारती मिळाल्या, तर यांची व्होट बँक नष्ट होईल. म्हणूनच हे लोक हिंसाचार भडकावत आहेत, असा आराेप उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे.

देश-विदेश

Yusuf Pathan बंगाल जळत असताना खासदार चहा पित आहेत; युसुफ पठाण यांच्यावर भाजपची सडकून टीका

पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यात सध्या वक्फ सुधारणा विधेयकाच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनांनी हिंसक वळण घेतले

Devendra Fadnavis
महाराष्ट्र

Devendra Fadnavis : वेळप्रसंगी रुग्णांना एअर ॲम्बुलन्सने ऐरोल बर्न हॉस्पीटलमध्ये हलवू, देवेंद्र फडणवीस यांनी दिला उमरेड घटनेतील जखमींना धीर

उमरेड येथील एमपीएम कंपनीमध्ये झालेली घटना ही दुर्देवी आहे. ज्या कुटुंबांनी आपल्या घरातील सदस्य गमावले त्या कुटुंबासमवेत शासन खंबीरपणे उभे आहे. जे कामगार जखमी झाले आहेत त्यांच्या उपचारासाठी कोणतीही कमतरता पडणार नाही. वेळप्रसंगी आवश्यकता भासल्यास रुग्णांना एअर ॲम्बुलन्सने ऐरोली येथील बर्न हॉस्पीटलमध्ये हलवू या शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उमरेड घटनेतील जखमी कामगारांच्या नातेवाईकांना धीर दिला.

Praful Patel
महाराष्ट्र

Praful Patel पवार काका – पुतणे एकत्र येण्यात गैर काय?: प्रफुल्ल पटेल

महाराष्ट्राच्या विकासासाठी शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले असतील आणि शरद पवार यांच्या अनुभवाचा काही फायदा होत असेल

महाराष्ट्र

Devendra Fadnavis शेतकऱ्यांना पुढील वर्षीपर्यंत १२ तास मोफत वीज, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

डिसेंबर २०२६ पर्यंत राज्यातील ८० टक्के शेतकऱ्यांना वर्षभर १२ तास मोफत वीज उपलब्ध करुन देण्यात येईल .

Sanjana Ghadi
मुंबई

Sanjana Ghadi : शिवसेना ठाकरे गट ठराविक गटाच्या ताब्यात; संजना घाडींचा उध्दव ठाकरेंना ‘जय महाराष्ट्र’ करताना टोला

शिवसेना ठाकरे गटामध्ये ठराविक टोळक्याने पक्षाची सूत्रे आपल्या हातात घेतली असून, निर्णय प्रक्रिया देखील त्यांच्या मनमानीवर आधारित असल्याचा गंभीर आरोप पक्षाच्या माजी उपनेत्या आणि आक्रमक महिला नेत्या संजना घाडी यांनी केला आहे. कार्यपद्धतीत बदल होण्याची अपेक्षा असतानाही विधानसभेतील पराभवानंतरही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जुन्याच शैलीने कारभार सुरू ठेवल्याचे त्यांनी स्पष्ट केले.