विशेष प्रतिनिधी
हिंगोली : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यात उघडकीस आलेल्या बनावट खत विक्री प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी कृषी विभागाला तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. बोगस खत विक्री हे केवळ आर्थिक फसवणूक नसून शेतकऱ्यांच्या श्रमांवर आणि उत्पादनावर थेट घाला आहे. त्यामुळे अशा प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कार्यक्षम यंत्रणा निर्माण करणे अत्यावश्यक असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांनी २० जून रोजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात निवेदन देऊन आपली मागणी मांडली. विभागाने या तक्रारींची दखल घेत गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. डॉ. गोऱ्हे यांनी (Neelam Gorhe) सांगितले की, अशा घटनांना आळा घालण्यासाठी राज्यस्तरावर विशेष चौकशी समिती तातडीने स्थापन करावी. खतांच्या गुणवत्तेचीतपासणी करावी . खत विक्रीसाठी ई-पॉस प्रणाली सक्तीची करून त्यासंदर्भात व्यापाऱ्यांना प्रशिक्षण व जनजागृती करण्यात यावी. बनावट खतामुळे नुकसान झाल्यास अशा शेतकऱ्यांसाठी विशेष नुकसानभरपाई योजना लागू करावी.
संशयित खत उत्पादक कंपन्यांचे परवाने तत्काळ रद्द करण्यात यावेत व गरज असल्यास त्यांच्यावर फसवणूक आणि सार्वजनिक जीवनाला धोका निर्माण करणाऱ्या कलमांखाली गुन्हे दाखल करावेत, असेही त्यांनी सुचवले.
कृषी खात्याने शेतकऱ्यांचा विश्वास जपण्यासाठी पारदर्शकता आणि तत्परता यांना सर्वोच्च प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षा डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली
Neelam Gorhe’s instructions to the Agriculture Department to take immediate action in the case of bogus fertilizer sale
महत्वाच्या बातम्या
- Girish Mahajan : तुम्ही राजकीय दलाली केल्यामुळेच उद्धवजींची सेना संपली, गिरीश महाजन यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार
- Rupali Chakankar : रुपाली चाकणकर काय रश्मिका मंदाना आहेत? सुषमा अंधारे यांचा सवाल
- Aditi Tatkare : सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण लाभ चार महिन्यांपूर्वीच बंद, आदिती तटकरे यांची माहिती
- Raju Shetti : शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना करणाऱ्या माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळात ठेवू नका, राजू शेट्टी यांची मागणी