Jayant Patil : कर्जमाफी सत्ताधाऱ्यांच्या शब्दाची वाफ, जयंत पाटील यांची टीका

विशेष प्रतिनिधी

सांगली : Jayant Patil कर्जमाफी ही फक्त सत्ताधाऱ्यांच्या शब्दाची वाफ आहे हे शेतकऱ्यानेही ओळखले आहे. सततचा दुष्का, अवकाळी पाऊस ह्याने तर शेतकरी पिचला आहेच, पण सरकारच्या असंवेदनशीलतेने त्याला हतबल बनवले आहे, अशी टीका राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार गटाच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. Jayant Patil

नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या आत्महत्येवर जयंत पाटील ट्विट करून म्हणाले, “नांदेड जिल्ह्यातील शेतकरी हरिदास बोंबले यांनी कर्ज वसुलीच्या तगाद्याला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केली. तर गव्हाचे बोगस बियाणे निघाल्याने जालना जिल्ह्यातील शेतकऱ्याने रोटावेटर फिरवून उभे पिक जमीनदोस्त केले. महाराष्ट्रातील शेतकरी इतका हतबल कधीच नव्हता. ही काय परिस्थिती निर्माण केली आहे? शेती साहित्य खरेदी करताना शेतकऱ्याला महागाईची झळ बसते, त्याला जीएसटीचा भुर्दंड भरावा लागतो. खताच्या किमती गगनाला भिडल्या आहेत असे ते म्हणाले. Jayant Patil

कर्जमाफी तर फक्त सत्ताधाऱ्यांच्या शब्दाची वाफ आहे हे शेतकऱ्याने ओळखले आहे. सततचा दुष्काळ, अवकाळी पाऊस ह्याने तर शेतकरी पिचला आहेच, पण सरकारच्या असंवेदनशीलतेने त्याला हतबल बनवले आहे. हे चित्र अत्यंत करुण आहे. आपल्या अन्नदात्याच्या घामाचे मोल काय? असा सवाल जयंत पाटील यांनी केला. Jayant Patil

एकाबाजूला श्रीमंत धनदांडग्या लोकांसाठी सरकार खैरात वाटत सुटले आहे. तर दुसरीकडे अनेक शेतकरी कुटुंब १ – २ लाखांच्या कर्जपायी घरचा आधार गमावत आहेत. शेतकरी स्व. हरिदास बोंबले यांच्या कुटुंबाला न्याय मिळायलाच पाहिजे तसेच सरकारने बोगस बियाणे विक्री करणाऱ्या कंपनीवर तत्काळ फौजदारी खटला दाखल केला पाहिजे. शेतकऱ्याला नुकसानीचा परतावा कंपनीकडून मिळाला पाहिजे,” अशी मागणीही जयंत पाटलांनी केली.

Jayant Patil criticizes the words of the rulers on loan waiver The vapor of words

महत्वाच्या बातम्या