Sharad Pawar आमची झोप उडाली, आता आमच कसं व्हायचं? देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर शरद पवार यांचा प्रश्न

Sharad Pawar आमची झोप उडाली, आता आमच कसं व्हायचं? देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर शरद पवार यांचा प्रश्न

Sharad Pawar

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धमकीमुळे आमची झोप उडाली आहे. आता आमच कसं व्हायचं? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली दोन दिवसांपूर्वी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाला 20 हजार कोटींच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली आहे. यावरून विरोधक आक्रमक झाले असून राज्य सरकारवर टीका करताना दिसत आहेत. Sharad Pawar

शक्तिपीठ महामार्गाबाबत प्रश्न विचारला असता, शरद पवार म्हणाले की, शक्तिपीठ महामार्गाचा विषय मला समजून घ्यायचा आहे. यासाठी मी कोल्हापूरच्या लोकांबरोबर मी बोलणार आहे. त्यानंतर राज्य सरकारने आम्हाला शक्तिपीठ महामार्गाबाबत माहिती देण्याची तयारी दाखवली तर तेही समजून घेण्याचा माझा विचार आहे. Sharad Pawar



शरद पवार म्हणाले की, हा प्रकल्प काय आहे? हे आधी मी समजून घेईन. त्याची आवश्यकता आहे का? ते समजून घेईन. त्यासाठी सरकारने आम्हाला माहिती दिली तर ती देखील मी घेणार आहे. ज्या भागातल्या शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या जाणार आहेत, त्या भागातले लोकप्रतिनिधी जे जाहीर बोलतायेत त्यांची मतं आणि त्यांचा आग्रह हा समजून घ्यावा लागेल. कारण मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही, असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.

शक्तिपीठ महामार्गाला काँग्रेस सर्वात जास्त विरोध करत असल्याचा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला होता. यावर बोलताना ते म्हणाले होते की, काँग्रेस पहिल्या दिवसापासून सर्वच विकासकामांना विरोध करत आहे. समृद्धी महामार्गाचा विरोध करणारी, हिच मंडळी होती. पण लोकांनी येऊन समृद्धी महामार्गाला समर्पण दिलं. मागच्या काळात कोल्हापूरच्या एअरपोर्टवर साडेतीनशे शेतकऱ्यांनी मला घेराव घातला आणि मला सह्यांचे पत्र देऊन सांगितलं की, आम्हाला शक्तिपीठ महामार्ग पाहिजे आहे. त्यांनी मला सांगितलं की, आम्ही खरे शेतकरी आहोत. तुम्ही आमच्या सह्या व्हेरिफाय करा, आमच्या नावावर शेती आहे की नाही, याची चौकशी करायला सांगितले. मी मान्य करतो की, काही लोकांचा विरोध असू शकतो. त्यामुळे आम्ही त्यांच्याशी संवाद साधू. पण कालच उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की, आम्हाला संवादाने ही गोष्ट करायची आहे. त्यामुळे आम्ही संवाद करू, पण राजकीय विरोध जे करतील, त्यांना मात्र आम्ही बघणार नाही, असा इशारा दिला होता.

We lost sleep, how can we be ourselves now? Sharad Pawar questions Devendra Fadnavis’ statement

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023