विशेष प्रतिनिधी
कोलकाता : Sharmistha Panoli आपल्या देशात विविध धर्माचे लोक एकत्र राहतात. आपल्याकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही दुसऱ्यांच्या भावना दुखवाल, असे सुनावत कोलकाता उच्च न्यायालयाने सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर शर्मिष्ठा पनोली हिला जामीन देण्यास नकार दिला.Sharmistha Panoli
पुण्यातील कायद्याची विद्यार्थी आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर शर्मिष्ठा पनोली हिच्या अटकेसंबंधी कलकत्ता उच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्या. पार्थसारथी चटर्जी यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने या सुनावणी सांगितले की तुम्ही तुमच्या वक्तव्याने देशातील लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. पनोलीच्या वकिलांनी तिच्याविरोधात दाखल करण्यात आलेली एफआयआर रद्द करण्याची मागणी केली आहे. ऑपरेशन सिंदूर बाबत टिप्पणी केल्याने पनोलीच्या विरोधात पश्चिम बंगाल पोलिसांनी कारवाई केली आहे. शर्मिष्ठा पनोली हिला धार्मिक भावना दुखावणारा व्हिडीओ केल्या प्रकरणातून अंतरिम जामीन देण्यास कलकत्ता उच्च न्यायालयाने मंगळवारी नकार दिला. यासोबतच न्यायालयाने पश्चिम बंगाल सरकारला पुढील सुनावणीच्या वेळेस केस डायरी जमा करण्याचे आदेश दिले आहेत.
- Devendra Fadnavis : आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी संयमी जीवनशैली आवश्यक, देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन
शर्मिष्ठा पनोली हिला 30 मे रोजी कोलकाता पोलिसांनी गुरुग्राम येथून अटक केली. 14 मे रोजी तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला. यात तिने ऑपरेशन सिंदूर आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर बॉलीवूड कलाकारांनी बाळगलेल्या मौनावरून टीका केली होती. इस्लाम आणि मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत काही आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याला मोठ्या प्रमाणात विरोध झाला. शर्मिष्ठाला थेट बलात्कार तसेच मारून टाकण्याची धमक्या मिळाल्या.
यानंतर तात्काळ तिने हा व्हिडीओ सोशल मीडियावरून काढून टाकला आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर विनाशर्त माफी मागितली. मी केलेली टीका ही व्यक्तिगत होती आणि कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता, असेही तिने म्हटले होते.
कोलकाता गार्डन रीच पोलीस स्टेशनमध्ये शर्मिष्ठाच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 196(1)(a), 299, 352 आणि 353 अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की, शर्मिष्ठा आणि तिच्या परिवाराला नोटीस बजावणे शक्य झाले नाही. त्यानंतर न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले. 31 मे रोजी अलीपूर न्यायालयाने तिला 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे.
आजच्या सुनावणी दरम्यान शर्मिष्ठाच्या वकिलांनी सांगितले की, तिचा मोबाइल आणि लॅपटॉप काढून घेतलेला असताना तिच्या अटकेची गरज नाही. शर्मिष्ठाने माफी मागितली असून तिचा हेतू देशभक्ती दाखवणे एवढाच होता, असाही युक्तिवाद त्यांनी केला. पण, तिच्या विधानांमुळे एका समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आणि धार्मिक अशांतता निर्माण झाल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. यासोबतच न्यायालयाचे , तुरुंगात शर्मिष्ठाला आवश्यक त्या सगळ्या सुविधा दिल्या जातील. पण तिला कैद्यांचा गणवेश घालावाच लागेल, असे म्हटले आहे.
Freedom of expression does not mean you hurt the sentiments of others, High Court tells Sharmistha Panoli
महत्वाच्या बातम्या
- Girish Mahajan : तुम्ही राजकीय दलाली केल्यामुळेच उद्धवजींची सेना संपली, गिरीश महाजन यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार
- Rupali Chakankar : रुपाली चाकणकर काय रश्मिका मंदाना आहेत? सुषमा अंधारे यांचा सवाल
- Aditi Tatkare : सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण लाभ चार महिन्यांपूर्वीच बंद, आदिती तटकरे यांची माहिती
- Raju Shetti : शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना करणाऱ्या माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळात ठेवू नका, राजू शेट्टी यांची मागणी