Prof. Dr. G. Madhavi Lata खडकाशी झुंज देत जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचा पाया भक्कम करणाऱ्या प्रा. डॉ. जी. माधवी लता

Prof. Dr. G. Madhavi Lata खडकाशी झुंज देत जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचा पाया भक्कम करणाऱ्या प्रा. डॉ. जी. माधवी लता

Prof. Dr. G. Madhavi Lata

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात चिनाब नदीवर उभारलेल्या जगातील सर्वात उंच रेल्वे पूलाचं उद्घाटन झालं. काश्मीरला भारताच्या रेल्वे नकाशावर आणून ‘काश्मीर ते कन्याकुमारी’ हे स्वप्न या पुलामुळे प्रत्यक्षात आले आहे. खडकाशी झुंज देत जगातील या सर्वात उंच रेल्वे पुलाचा पाया भक्कम करणाऱ्या प्रा. डॉ. जी. माधवी लता यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. G. Madhavi Lata

भारतीय विज्ञान संस्थेच्या (IISc) भू-तांत्रिक अभियांत्रिकीच्या प्रा. डॉ. जी. माधवी लता यांच्या अथक अभ्यासातून या पुलाचे काम शक्य झाले. हा पूल हा चिनाब नदीपासून तब्बल ३५८ मीटर उंच आहे त्याची उंची आयफेल टॉवरपेक्षा तब्बल ३५ मीटर जास्त आहे. पुलाची लांबी १,३१५ मीटर आहे. हा पूल कटरा आणि काझीगुंडला जोडतो आणि उधमपूर-श्रीनगर-बारामुला रेल्वे प्रकल्पाचा भाग आहे. याचे आयुष्य १२० वर्षांपर्यंत असणार असून, एकूण बांधकाम खर्च १,४८६ कोटी रुपये इतका झाला. सरकारने या प्रकल्पाला “भारतीय रेल्वेच्या इतिहासातील सर्वात मोठं अभियांत्रिकी आव्हान” असं संबोधलं आहे.

परंतु, या भव्य पूलाच्या यशामागे केवळ मोठ्या यंत्रणा नव्हत्या. या प्रकल्पात वर्षानुवर्षं तळमळीने काम करणारी एक वैज्ञानिक होती डॉ. माधवी लता. त्या भू-तांत्रिक अभियांत्रिकी म्हणजेच खडक आणि मातीच्या अभ्यासातील तज्ज्ञ आहेत. उत्तर रेल्वे आणि अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर यांनी त्यांना सल्लागार म्हणून नेमलं होतं. त्यांचं काम होतं या पुलासाठी असा मजबूत पाया तयार करणं की जो हिमालयातील तीव्र उतार, भूकंपाचा धोका, २६० किमी/तास वेगाचे वारे आणि खडकांच्या अनिश्चित रचनेला तोंड देऊ शकेल.

सुरुवातीपासूनच अनेक अडचणी होत्या. खडकांचं तुकड्यांमध्ये विभागलेलं स्वरूप, लपलेल्या गुहा, बदलणाऱ्या जमिनीच्या संरचना आणि पाण्याचं व्यवस्थापन. अशा वेळी डॉ. लता आणि त्यांच्या टीमने पारंपरिक आराखडे बाजूला ठेवून “Design as You Go” म्हणजेच प्रत्यक्ष बांधकामाच्या वेळीच बदल करता येतील अशी लवचिक पद्धत वापरली. त्यांनी अनेक वेळा प्रतिक्षा जागेवर नव्याने डिझाईन ठरवून काम केलं.

या प्रक्रियेत त्यांनी उतारांची स्थिरता तपासली, सिमेंट ग्राऊटिंग केली, आणि हजारो मीटर लांबीचे rock anchors वापरले जे खडकांत खोलवर बसवले जातात. संपूर्ण पूल घट्ट ठेवण्याचं काम करतात. विशेष म्हणजे या पुलाचा जवळपास ५०० मीटर भाग असा आहे की जिथे खालून कोणताही आधार नाही आणि तरीही हा पूल स्थिर आहे, यामागे डॉ. लता यांच्या संशोधनाची ताकद आहे.

डॉ. लता यांचा शैक्षणिक प्रवासही तितकाच प्रेरणादायक आहे. त्यांनी १९९२ मध्ये जवाहरलाल नेहरू टेक्नोलॉजिकल युनिव्हर्सिटीमधून बी. टेक पूर्ण केलं. नंतर NIT Warangal मधून M.Tech करताना सुवर्ण पदक मिळवलं. २००० मध्ये IIT मद्रास मधून PhD पूर्ण केली आणि IIT गुवाहाटीमध्ये काही काळ अध्यापन करून २००४ पासून त्या IISc मध्ये कार्यरत आहेत. आज त्या सस्टेनेबल टेक्नॉलॉजी सेंटरच्या प्रमुख आहेत.

IISc मध्ये दाखल झाल्यावर त्या सिव्हिल अभियांत्रिकी विभागातील एकमेव महिला प्राध्यापिका होत्या. त्या काळी विभागात महिलांसाठी स्वतंत्र शौचालयसुद्धा नव्हतं. आज त्या महिला विद्यार्थ्यांसाठी विशेष सहाय्यक उपलब्ध करून देतात, त्यांच्या गरजा समजून घेतात. त्या म्हणतात, “स्त्री असल्यामुळे त्यांना काय वाटतं, हे मला अधिक चांगलं समजतं.”

पूलाच्या उद्घाटनानंतर IISc ने त्यांच्या सोशल मीडियावरून गौरव करत म्हटलं – “प्रा. माधवी लता आणि त्यांच्या टीमचा आम्हाला अभिमान आहे. त्यांनी चेनाब पुलासाठी उतारांचं स्थिरता विश्लेषण, पाया डिझाईन आणि रॉक अँकर्सची रचना अशा अनेक महत्त्वाच्या बाबतीत योगदान दिलं.”

आज चिनाब पूल उभा आहे, तो केवळ स्टील आणि सिमेंटमुळे नव्हे, तर अशा एका वैज्ञानिकाच्या सततच्या १७ वर्षांच्या समर्पणामुळे. डॉ. माधवी लता यांच्या कष्टामुळे, विज्ञानावर असलेल्या विश्वासामुळे, आणि त्यांच्या निर्णयक्षमतेमुळेच हा पूल प्रत्यक्षात उभा राहू शकला. हा पूल भारताच्या विज्ञानाचा आणि महिला शक्तीचे प्रतिक झाला आहे.

Prof. Dr. G. Madhavi Lata, who fought against the rock and strengthened the foundation of the world’s highest railway bridge

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023