विशेष प्रतिनिधी
मुंबई : सोलापूरचे सुपूत्र, सुप्रसिद्ध वनस्पतीशास्त्रज्ञ, अरण्यऋषी मारुती चित्तमपल्ली यांचे बुधवारी संध्याकाळी निधन झाले. ते 93 वर्षांचे होते. त्यांना नुकताच पद्मश्री पुरस्कार मिळाला होता. Maruti Chitampally
हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी ते दिल्लीला गेले होते. त्यानंतर त्यांची तब्येत खालावल्याने ते आजारीच होते. हा पुरस्कार घेऊन दिल्लीहून परतल्यापासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. अखेर, बुधवार, 18 जून रोजी संध्याकाळी 7 च्या सुमारास सोलापुरातील राहत्या घरी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने मराठीतील थोर साहित्यिक आणि पक्षीतज्ज्ञ गमावल्याची भावना व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मारुती चितमपल्ली यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.
चितमपल्ली यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली. मुख्यमंत्री म्हणतात, निसर्गाला ज्यांनी शब्दरुपाने सजवले, त्यातून विपूल साहित्यसंपदा निर्माण करुन जनसामान्यांना निसर्गाचे ज्ञान दिले, असे अरण्यऋषी पद्मश्री मारुती चितमपल्ली यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक आणि मनाला चटका लावणारे आहे.
वनविभागात काम करताना आपल्या कामाशी किती एकरुप व्हावे, याचे आदर्श उदाहरण म्हणजे चितमपल्ली सर. ते व्रतस्थ भूमिका जगले. 13 भाषा जाणणार्या चितमपल्ली सरांनी निसर्गाच्या अनेक किमया त्यांनी शब्दांतून मांडल्या. आदिवासींकडे असलेले ज्ञान त्यांनी शब्दबद्ध केले. पक्ष्यांची भाषा जगाला सांगितली. त्यांनी तयार केलेले वनोपनिषद, पक्षीकोष हे ज्ञानधन त्यांनी कायमस्वरुपी आपल्याला उपलब्ध करून दिल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. साहित्यसेवा करताना अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. त्यांच्या या समग्र कार्याचा गौरव म्हणून याचवर्षी त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांच्या निधनाने कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाल्याची खंतही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
Chief Minister pays tribute to forest sage Maruti Chitampally, who adorned nature with words
महत्वाच्या बातम्या
- Girish Mahajan : तुम्ही राजकीय दलाली केल्यामुळेच उद्धवजींची सेना संपली, गिरीश महाजन यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार
- Rupali Chakankar : रुपाली चाकणकर काय रश्मिका मंदाना आहेत? सुषमा अंधारे यांचा सवाल
- Aditi Tatkare : सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण लाभ चार महिन्यांपूर्वीच बंद, आदिती तटकरे यांची माहिती
- Raju Shetti : शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना करणाऱ्या माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळात ठेवू नका, राजू शेट्टी यांची मागणी